Join us  

कोण होतीस तू, काय झालीस तू..?, आर्ची उर्फ रिंकू राजगुरूच्या या फोटोने वेधले सगळ्यांचे लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2020 1:24 PM

रिंकू राजगुरुने नुकताच शेअर केलेल्या फोटोने व त्यावरील कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.

सैराटमधील आर्चीच्या भूमिकेतून घराघरात पोहचलेली अभिनेत्री रिंकू राजगुरू सध्या लॉकडाऊनमुळे तिच्या मूळ गावी अकलूजला आहे. मात्र ती सोशल मीडियावर एक्टिव्ह असून चाहत्यांशी संवाद साधत आहे. नुकताच तिने एक फोटो शेअर केला आहे. तिच्या या फोटोने व त्यावरील कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे.रिंकूने ती शांत बसलेला असा फोटो इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटलं की, एखाद्याला उत्तर देण्यापेक्षा शांत बसणे उत्तम.

रिंकूच्या या फोटोने आणि त्यावरील कॅप्शनने सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. तिच्या या फोटोवर बॉलिवूड अभिनेता ईशान खट्टरनेही रिप्लाय दिला आहे. इतकंच नाही तर काही लोकांनी तिला इतरांकडे दुर्लक्ष कर असे कमेंट केले आहे. रिंकू नक्की असं का म्हणाली हे अद्याप समजू शकलेले नाही.  

लवकरच रिंकू बॉलिवूडचे सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासोबत झळकणार आहे. या चित्रपटाचं नाव आहे झुंड. या चित्रपटाचे दिग्दर्शन नागराज मंजुळे करत आहे.

रिंकू शाळेत असतानाच तिला सैराट हा चित्रपट मिळाला आणि तिचे संपूर्ण आयुष्य बदलून गेले. या चित्रपटानंतर रिंकू कागर, मेकअप या मराठी चित्रपटात झळकली.

नुकतीच तिची 100 ही हिंदी वेबसीरिज हॉटस्टारवर रिलीज झाली आहे. या सीरिजमधील रिंकूच्या कामाचं खूप कौतूक होत आहे.

टॅग्स :रिंकू राजगुरूलारा दत्ताअमिताभ बच्चननागराज मंजुळे