सुबोध कशाची जागृती करतोय?
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 1, 2016 15:16 IST
मुंबई एक्सप्रेस हायवेवर आता अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढलेले दिसत आहे. अनेकजणांनी या हायवेवर अपघातात्प्राण देखील गमावला आहे. अनेक कालाकार ...
सुबोध कशाची जागृती करतोय?
मुंबई एक्सप्रेस हायवेवर आता अपघातांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढलेले दिसत आहे. अनेकजणांनी या हायवेवर अपघातात्प्राण देखील गमावला आहे. अनेक कालाकार देखील नेहमीच पुणे-मुंबई हा प्रवास याच हायवेवरुन करतात. मध्यंतरीच आपण आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे या दोन अभिनेत्यांना याच हायवेवरील अपघातात गमावले आहे. या विषयी सुबोधने सोशल मिडियावर एक व्हिडिओ शेअर करताना म्हटले, ''नमस्कार आज मुंबईहून पुण्याला प्रवास करतोय एक्स्प्रेस हायवेवरुन आणि आजचा माझा अनुभव फार विलक्षण असा आयुष्यभर स्मरणात राहिल. एक्स्प्रेस हायवेला लागल्यापासून माज्या लक्षात एक गोष्ट आली, की हा रस्ता फक्त ट्रकवाल्यांसाठी बनला आहे. कारण तीन लेनवरुन गाड्या न चालवण्याचे नियम बहुतेक करुन त्यांच्यासाठी नसावेत किंवा कुठनही कशी गाडी चालवा, हे नियम बहुतेक करुन त्यांच्यासाठीच असावेत. काही काही अंतरावर मला बाईकवाले दिसले. काही राँग साईडने येत होते, काही आमच्याचबरोबर चालत होते, काही आमच्या वेगाशी स्पर्धा करत होते. मग अचानक मला वाटलं, की आपण नॅशनल पार्कमध्ये आल्यासारखं वाटलं. काही प्राणी दिसले. गाई-बैल चरताना दिसल्या आणि मग लक्षात आलं, की याच महिन्यात काही वर्षांपूर्वी आमचा अत्यंत जवळचा मित्र आनंद अभ्यंकर आणि अक्षय पेंडसे यांचे इथेच अपघाती निधन झालं. अनेक लोकांचे जवळचे नातेवाईक गेले असतील, आईवडील गेले असतील. मावशी गेली असेल, काका-मित्र गेले असतील. मुलं गेली असतील. पण तरीसुद्धा आम्ही अजून सुधारलेलो नाही... आम्ही अजून त्याच पद्धतीनी हा एक्स्प्रेस हायवेवरचा कारभार हाकतोय. टोल भरतोय आणि स्वत:च्या जीवाशी खेळतोय. खूप सुखद असा प्रवास कधीच विसरु शकणार नाही आणि मला असं वाटतं, की यात सुधारणा व्हायचे काहीच चान्सेस नाहीत, असो जय हिंद जय महाराष्ट्र. सुबोधचा या व्हीडिओमुळे आता काही फरक पडतोय का ते पाहूयात.