Join us  

Ranbir-Aliaनंतर मलायका-अर्जुन बांधणार लग्नगाठ? अभिनेत्याने स्पष्टच सांगितलं; म्हणाला..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2022 12:08 PM

बॉलिवूडमधील क्यूट जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी अखेर लग्नबंधनात बांधली गेली आहे. यानंतर आता मलायका-अर्जुन कपूरच्या लग्नाची चर्चा सुरु झाली आहे.

बॉलिवूडमधील क्यूट जोडी रणबीर कपूर आणि आलिया भट्ट ही जोडी अखेर लग्नबंधनात बांधली गेली आहे. १४ एप्रिल रोजी मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत या जोडीने लग्न केलं. विशेष म्हणजे हे लग्न झाल्यापासून सोशल मीडियावर सातत्याने रणबीर- आलिया ही जोडी ट्रेंड होत आहे. पण यानंतर आता बी-टाऊनमधील कोणती जोडी लग्नाच्या बेडीत अडकणार याची उत्सुकता सगळ्यांना आहे.डाएट सब्या नावाच्या व्हिडिओ एडिटरलासुद्धा हीच उत्सुकता लागली होती. म्हणून त्याने अर्जुन कपूर (Arjun Kapoor)ला थेट  त्याच्या आणि मलायका अरोरा(Malaika Arora)  च्या लग्नाबाबत विचारलं. यावर अर्जुननेही त्याला उत्तर दिलं.  

डाएट सब्याने अर्जुन कपूरला 'लग्न कधी ?' असा मेसेज पाठवला तेव्हा अर्जुनने त्याला उत्तरही दिला. डाएट सब्याने त्याच्या इन्स्टा स्टोरीवर अर्जुनच्या उत्तराचा स्क्रीनशॉट शेअर केला आहे. यावर विश्वास ठेवला तर सब्याचा प्रश्न खूप कठीण असल्याचे सांगत त्याने लग्न करण्याबाबत खुलासा केला आहे.सध्या या पोस्टची सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होतोये. 

स्क्रिनशॉटमध्ये लिहिलंय की, "अर्जुन कपूर कधीच लग्न करणार नाही असे दिसते. आम्ही तुमच्यावर प्रेम करतो इट्स कूल" त्यात एक हसणारा इमोजीही जोडण्यात आला आहे. यानंतर डाएट सब्याने अर्जुनला एक प्रश्न विचारला- 'लग्न कधी करणार?' यावर उत्तर देताना अर्जुन कपूर लिहितो, "कठीण प्रश्न आहे" पुढे त्याने लिहिले, "तुझी ओळख उघड केल्यावर मी लग्न करेन..."

अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून एकमेकांना डेट करत आहेत. त्यांनी 2019 मध्ये त्यांचे नाते अधिकृत केले आणि तेव्हापासून ते सोशल मीडियावर एकमेकांसोबत फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात.  

टॅग्स :रणबीर कपूर आलिया भट्ट लग्नगाठअर्जुन कपूरमलायका अरोरा