Join us  

आम्ही दोघी मालिकेत मधुरा करतेय आदित्यला जिंकण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Published: September 20, 2018 3:47 PM

'आम्ही दोघी' मालिकेचे कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते.

ठळक मुद्देमधुरा आदित्यला जिंकण्यासाठी करत आहे शर्थीचे प्रयत्नमधुरा मीराला ठरवतेय खोटे

झी युवा वाहिनीवरील मालिका 'आम्ही दोघी' मालिका प्रेक्षकांना चांगलीच भावली आहे. या मालिकेचे कथानक मीरा आणि मधुरा या एकमेकींच्या विरुद्ध व्यक्तिमत्व असलेल्या दोन बहिणींच्या नात्याभोवती फिरते. मोठी बहीण मीरा निरागस, प्रामाणिक आणि स्वच्छ मनाची आहे तर लहान बहीण मधुरा खोडकर आणि स्वच्छंदी आहे. सध्या मालिकेत प्रेक्षक लव्ह ट्रँगल अनुभवत आहेत.नुकतेच मालिकेत प्रेक्षकांनी पाहिले की आदित्यने मीराबद्दलच्या भावना व्यक्त केल्यावर मधुराने देखील तिला आदित्य आवडत असल्याचे सगळ्यांसमोर कबूल केले. फक्त कबूलच नाही तर तो फक्त तिचाच आहे असे ठणकावून सगळ्यांना सांगितले. आदित्य आणि मधुराच्या या बोलण्यामुळे संपूर्ण कुटुंब आश्चर्यचकित झाले आहे. आदित्य आणि मीरा मधुराला वेळ मारून नेण्यासाठी सगळ्यांसमोर आदित्यला तसे बोलावे लागले असल्याचे सांगतात आणि हे कळल्यापासून मधुरा आदित्यला इम्प्रेस करण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहे. त्यासाठी ती कुठल्याही थराला जायला मागे पुढे बघत नाही आहे. आदित्यचे मन जिंकण्यासाठी मधुरा मीराला त्याच्या नजरेत खाली पडायचा, तिला खोटे ठरवण्याचा प्रयत्न करते आहे. आदित्य देखील तिच्या वागण्यातील बदल अनुभवत आहे. मधुरा आदित्यला मीरापासून तोडण्यात यशस्वी होईल का? मधुराच्या नकळत मीरा आणि आदित्य एकत्र येतील का? हे प्रेक्षक आगामी भागात पाहायला मिळणार आहे.  

टॅग्स :आम्ही दोघी मालिका