Join us  

'बाहेर बोलले तर फटके पडतील', मिर्झापूर - 2 बॉयकॉट करणाऱ्यांना 'मुन्ना भैया'चा दणका...

By अमित इंगोले | Published: October 12, 2020 12:10 PM

काही लोकांनी सीरीजला गुड्डू पंडीत(अली फजल)च्या जुन्या ट्विटमुळे बॉयकॉट केलंय आणि ट्विटरवर बायकॉट मिर्झापूर ट्रेन्डही होऊ लागलं.

23 ऑक्टोबरपासून 'मिर्झापूर' वेबसीरीजचा दुसरा सीझन बघायला मिळणार आहे. ६ ऑक्टोबरला याचा ट्रेलर रिलीज करण्यात आला होता. ट्रेलर प्रेक्षकांना चांगलाच आवडला आणि ते आता वेबसीरीजची आतुरतेने वाट बघत आहेत. पण काही लोकांनी सीरीजला गुड्डू पंडीत(अली फजल)च्या जुन्या ट्विटमुळे बॉयकॉट केलंय आणि ट्विटरवर बॉयकॉट मिर्झापूर ट्रेन्डही होऊ लागलं.

या सर्व प्रकरणावर आपलं मत मांडत अली फजल म्हणाला होता की, समाजातील एका छोट्याशा वर्गाच्या विरोधाला समोर ठेवून ते मागे हटणार नाहीत. आता या प्रकरणावर सीरीजमधील मुन्ना भैया(दिव्येंदु शर्मा)ने आपलं मत मांडलं आहे. दिव्येंदु शर्मा म्हणाला की, त्याला या बॉयकॉटने फरक पडत नाही. अशा लोकांना माहीत नाही की, ते किती अडचणीत आहेत. (Mirzapur 2 Trailer : गुड्डू पंडीत बदला घेण्यासाठी सज्ज, मिर्झापूरवरही करणार राज्य...)

आयएनएससोबत बोलताना दिव्येंदु म्हणाला की, 'मला या गोष्टींमुळे जास्त त्रास होत नाही. बॉयकॉट करणाऱ्या लोकांना हे माहीत नाही की, ते किती अडचणीत आहेत. कारण मिर्झापूरचे फॅन्स जास्त आहेत. त्यांनी हा मूर्खपणा बंद करावा. अशाप्रकारचा हॅशटॅग वापरणं मूर्खपणा आहे. सर्वांनाच माहीत आहे की, लोक मिर्झापूरवर किती प्रेम करतात. हे सगळे पेड ट्रेन्ड आहेत. मला त्यांची दया येते'.

दिव्येंदु पुढे म्हणाला की, 'बाहेर निघून काही लोकांनी बायकॉटचा विषय काढू नये. खूप मार पडेल त्यांना'. सोबतच तो म्हणाला की, मिर्झापूर सीरीजसोबत जुळणं फार शानदार अनुभव होता. मी तो शब्दात सांगू शकत नाही. जेव्हाही मी कुठे जातो, खासकरून उत्तरप्रदेशातील लोक माझ्याजवळ येतात आणि मला मुन्ना भैया म्हणून हाक मारतात. इतकं प्रेम आणि लोकप्रियता मिळणं आनंदाची बाब आहे'.

मिर्झापूर सीरीजमध्ये दिव्येंदु शर्माने मुन्ना भैया नावाची भूमिका साकारली आहे. मुन्ना भैया अखंडानंद त्रिपाठी उर्फ कालीन भैयाचा बिघडलेला मुलगा आहे. सीरीजमधील त्याची ही भूमिका प्रेक्षकांना फारच पसंत पडली आहे. इतर भूमिकांप्रमाणेच ही भूमिकाही लोकांनी डोक्यावर घेतली आहे. 

काय म्हणाला अली फजल?

अली फजलचं म्हणणं आहे की, आपण ट्रेंडच्या दयेवर आहोत का? टाइम्स नाउ डिजीटलसोबत बोलताना अली म्हणाला की, 'आपल्याला निर्णय घ्यावा लागेल की, आपली बाजू काय आहे. काय आपण ट्रेंडच्या दयेवर जिवंत आहोत. नाही. मी कोणत्याही कलेकडे त्या दृष्टीने बघत नाही. आपण केवळ एका अॅपच्या भरोश्यावर आहोत का की, आपण हा निर्णय घ्यायचा की आपला शो कोण बघणार आणि कोण नाही. नाही. मला वाटतं या गोष्टी आता खाली आल्या आहेत'. (Mirzapur 2 Trailer : गुड्डू पंडीत बदला घेण्यासाठी सज्ज, मिर्झापूरवरही करणार राज्य...)

अली म्हणाला की, जर तुम्ही ट्रेंडबाबत बोलाल तर मी कधीच नाही पाहिलं की, शेतकऱ्यांशी संबंधित मुद्दे ट्रेंडमध्ये आलेत.  देशात सगळीकडे शेतकऱ्यांची आंदोलने झालीत. मला वाटतं की, आता लोकांनी ट्रेंडसारख्या गोष्टींच्या पलिकडे बघण्याची गरज आहे. 

का केलं जातंय बॉयकॉट?

दरम्यान, सीएए आणि एनआरसीसारख्या मुद्द्यांवर अली आणि वेबसीरीजचा निर्माता फरहान अख्तरने आवाज उठवला होता. या विरोधात वक्तव्ये केली होती. याच कारणामुळे काही लोक त्यांना ट्रोल करत आहेत आणि वेबसीरीज बॉयकॉट करण्याचाी मागणी करत आहेत. 

टॅग्स :मिर्झापूर वेबसीरिजवेबसीरिज