Join us  

एका चित्रपटामुळे झालेली दिया आणि साहिलची मुलाखत, लग्नही केलं, पण...; अवघ्या पाच वर्षांतच का मोडला संसार?

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2023 3:15 PM

दियाने 2014 मध्ये साहिल संघासोबत पहिलं लग्न केले होते.

अभिनेत्री दिया मिर्झा सिनेमांपेक्षा तिच्या खासगी आयुष्यामुळे जास्त चर्चेत असते. दियाने 2000 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब मिळवला. त्यानंतर ती मिस एशिया पॅसिफिक बनली. मिस एशिया पॅसिफिक बनल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या. रहेना है तेरे दिल में मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दियाने 2014 मध्ये साहिल संघासोबत लग्न केले होते. 

दोघांची पहिली ओळख 2009 मध्ये झाली होती ज्यावेळी एका सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन साहिल दियाच्या घरी गेला होता. त्या छोट्याशा भेटीत साहिलला पाहून दियाच्या मनाची तार छेडली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. ब्रुकलेन ब्रिजवर साहिलने दियाला प्रपोज केले होते.

दिया आणि साहिल एका अॅवॉर्ड फंक्शनसाठी न्यूयॉर्कला गेले होते. याच दरम्यान दोघे ब्रुकलेन ब्रिजवर फिरत होते, ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कपल्स सनसेट बघायला येतात.पुलाच्या मधोमध साहिल घुडग्यांवर बसला आणि दियाला प्रपोज केले. दियानेही क्षणाचा विलंब न करता साहिलला होकार दिला. दोघांच्या लग्नाचे सेलिब्रेशन चक्क चार दिवस चालले होते.

लग्नाच्या सुरुवातीला सर्व काही ठीक होते, पण काही वर्षांनी त्यांच्या नात्यात दुरावा आला. पाच वर्षांनंतर दोघांनी परस्पर संमतीने वेगळे होण्याचा निर्णय घेतला. दियाने घटस्फोटाची माहिती तिच्या चाहत्यांना सोशल मीडियावर दिली होती. 

यानंतर दियाने बिझनेसमन वैभव रेखीसोबत विवाहबंधनात अडकली आहे. या लग्न सोहळ्याला दीया आणि वैभवच्या जवळच्या लोकांच्या उपस्थितीत झाले. लग्नाच्या काही महिन्यात दिया आई झाली. 

टॅग्स :दीया मिर्झा