Join us  

'या' तरूणीला घाबरून 'मिस इंडिया' स्पर्धेतून माघार घेणार होती सुष्मिता, पण...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2021 12:54 PM

Shushmita Sen : मीडिल क्लास फॅमिलीतून आलेली सुष्मिता सेन जेव्हा घरी परतली तेव्हा तिने सगळा प्रकार आईला सांगितला.  सुष्मिताला स्पर्धेपासून दूर जात असताना पाहून आई रागावली आणि तिने समजवलं.

आपलं सौंदर्य आणि अदाकारीसाठी कोट्यावधी लोकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री सुष्मिता सेनला आज कोणत्याही ओळखीची गरज नाही. मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर सुष्मिताने लोकांच्या मनात जागा निर्माण केली आहे. अलिकडे मिस  यूनिव्हर्स राहिलेल्या सुष्मिता सेनकडून (Sushmita Sen) लोकांनी अनेक न ऐकलेल्या गोष्टी ऐकल्या. 

मिस इंडिया स्पर्धेतून माघार घेणार होती

आज भलेही सुष्मिाता सेनला तिच्या कामामुळे ओळखलं जातं. पण एक वेळ अशीही होती की, सुष्मिता एका तरूणीला इतकी घाबरली होती की, 'मिस इंडिया' (Miss India) स्पर्धेतून आपलं नाव ती परत घेणार होती. तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की ती तरूणी दुसरी तिसरी कुणी नसून ऐश्वर्या राय (Aishwarya Rai) आहे. ऐकायला अजब वाटतं. पण हे सत्य आहे. या गोष्टीचा खुलासा अभिनेत्रीने एका मुलाखतीतून केला होता.

का घाबरली होती सुष्मिता?

१९९४ मिस इंडिया ब्युटी पेजेंटमध्ये भाग घेणाऱ्या सुष्मिताला हे माहीत नव्हतं की, या स्पर्धेत ऐश्वर्या राय सुद्धा भाग घेणार आहे. त्यावेळी ऐश्वर्या रायच्या सुंदरतेचा बोलबाला होता. ऐश्वर्याच्या सुंदरतेचा दबदबा बघून स्पर्धेत भाग घेणाऱ्या अनेक तरूणी आपलं नाव मागे घेत होत्या. तरूणींची ऐश्वर्या नावाने असणारी भीती पाहून सुष्मिता सेनचा कॉन्फिडन्सही हलला होता. ज्यानंतर तिने स्पर्धेतून माघार घेण्याचं मन बनवलं होतं.

आईने दिली हिंमत

मीडिल क्लास फॅमिलीतून आलेली सुष्मिता सेन जेव्हा घरी परतली तेव्हा तिने सगळा प्रकार आईला सांगितला.  सुष्मिताला स्पर्धेपासून दूर जात असताना पाहून आई रागावली आणि तिने समजवलं की, प्रयत्न न करताच तू हार कशी मानू शकते. आईने समजावल्यावर सुष्मिताने स्पर्धेत भाग घेतला. पण मनातल्या मनात ती फार घाबरलेली होती.

नशीब बघा सुष्मिता ऐश्वर्याच्या भीतीने पेजेंट स्पर्धेत भाग घेण्यास घाबरत होती. शेवटी फायनल राऊंडमध्ये तिनेच ऐश्वर्याला हरवून मिस इंडिया किताब आपल्या नावावर केला होता. त्यानंतर तिने कधीही मागे वळून पाहिलं नाही.   

टॅग्स :सुश्मिता सेनबॉलिवूड