Join us  

Video: त्या रात्री नेमकं काय घडलं सलमान खान आणि विवेक ऑबेरॉयमध्ये?, विवेक ऑबेरॉयने केले सलमानला एक्सपोझ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2020 1:09 PM

सलमान खानमुळे विवेक ऑबेरॉयला सिनेइंडस्ट्रीत काम मिळणे बंद झाले होते. अनेक वर्षे विवेक इंडस्ट्रीतून गायब होता.

सलमान खान आणि विवेक ओबेरॉय यांच्यातील वैर जगापासून लपून राहिलेले नाही. ऐश्वर्या राय हे या वैराचे कारण हेही सगळ्यांनाच ठाऊक आहे. 2003 मध्ये विवेक ओबेरॉयने स्वत: पत्रपरिषद घेत, सलमानबद्दल एक मोठा खुलासा केला होता. ‘मी आणि ऐश्वर्या सोबत आल्यानंतर सलमानकडून मला जीवे मारण्याच्या धमकीचे फोन येत आहेत. सलमानने रात्री नशेत मला 41 वेळा फोन केला आणि जीवे मारण्याची धमकी दिली,’ असा हा खुलासा होता. त्याच्या या खुलाशानंतर फिल्म इंडस्ट्रीने विवेकला काम देणे बंद केले होते. अनेक वर्षे विवेक इंडस्ट्रीतून गायब होता. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.

विवेक ऑबरायचा व्हायर होत असलेल्या व्हिडिओत विवेक म्हणाला की, रात्री 12.30 वाजल्यापासून पहाटेच्या 5 वाजेपर्यंत हे नाट्य चालू होते. सलमान खानने माझ्या मोबाईलवर फोन केला होता. मी फोन उचलला आणि माझ्याशी बोलू लागला. सुरूवातीलाच जेव्हा त्याने बोलायला सुरूवात केली तेव्हा मला वाटले की त्याने खूप दारू प्याली आहे आणि खूप नशेत आहे. त्याने तू कोण आहेस असं विचारू लागला. तू स्वतःला कोण समजतोस, सुरूवातीला मला काहीच समजत नव्हते की सलमान असा का बोलतो आहे. कोणत्या कारणामुळे माझ्याशी हा असा बोलतो आहे.तो खूप उद्धटपणे व वाईटरित्या बोलत होता. त्याचे बोलणे ऐकून मला लाज वाट होती. त्याने तू माझ्यासारखा वाईट माणूस आहे. 

त्यावर मी त्याला बोललो की, सलमान माझी व तुझी तुलना अजिबात करू नकोस. मी अजिबात तुझ्यासारखा नाही आहे. मला माहित आहे की लोकांचा व महिलांचा आदर कसा ठेवला जातो. मला माहित आहे की उद्धटपणे, इगोमध्ये लोकांशी बोलले नाही पाहिजे. मी लोकांना मदत करतो ना की लोकांना धमकावतो किंवा त्यांचे आयुष्य उद्धवस्त करतो.  जर तुला माझ्याशी काही प्रॉब्लेम असेल तर माझ्याशी बोल, असे विवेक सांगत होता. 

पुढे विवेकने सांगितले की, त्याने मला विचारलं की तुझे कोणाशी अफेयर चालू होते. तर मी म्हटलं पहिली गोष्ट म्हणजे माझे कोणाशी अफेअर नाही आहे. माझी बऱ्याच लोकांसोबत खूप चांगली मैत्री आहे. त्यानंतर त्याने एकानंतर एक नाव घ्यायला सुरूवात केली. मी ऐकल्यानंतर दंग झालो. त्याने सर्वात पहिला ऐश्वर्या राय, मग दीया मिर्झा, राणी मुखर्जी, सौमी अली यांची नावे घेतले. ते ऐकून मला धक्का बसला. कारण मी ज्यांच्यासोबत काम केले आहे. त्यांच्यासोबत माझे नाव जोडले. पण सोमी अली सोबत फक्त मोजून चार वेळा भेट झाली असेल. या सगळ्यांसोबत माझे शारिरीक संबध आहेत आणि यांच्यासोबत माझे अफेयर होते, असे सलमान बोलत होता. इथपर्यंत मी गप्प बसलो होतो. इतकंच नाही तर या अभिनेत्रींसोबत माझी फियॉन्से गुरप्रीतबद्दलही वाईट भाष्य केले. 

मग मी सलमान आता थांबव असे सांगितले. फोन कट केला. त्याने एका रात्रीत जवळपास 41 वेळा कॉल केला. मी त्याला खूप समजावले. पण यानंतर जर तू काही बोललास तर आपले संबंध खराब होतील. मी म्हटलं की माझे सोहेल व अरबाजसोबत चांगले नाते आहे. माझ्या करियरच्या सुरूवातीला सलीम अंकलने मला मार्गदर्शन केले होते. माझे वडील व सलीम अंकल चांगले मित्र आहेत. जेव्हा माझे वडील सिनेइंडस्ट्रीत आले होते त्यावेळी ते सलीम अंकलचे सल्ले घेत होते. जसे मी असे बोललो तेव्हा त्याने सुरेश ऑबेरॉय आहेत कोण आणि स्वतःच्या व माझ्या वडिलांना शिव्या घालायला सुरूवात केली, असे विवेकने सांगितले.

टॅग्स :विवेक ऑबेरॉयसलमान खान