Join us  

जेव्हा विद्या बालनला 5 स्टार हॉटेलसमोर मागावी लागली होती भीक; अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2024 1:44 PM

विद्या बालन हिने मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे.

बॉलिवूड अभिनेत्री विद्या बालन तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. अभिनेत्रीने दमदार चित्रपटांमध्ये काम केलं आहे.  मेहनत आणि कौशल्याच्या जोरावर अभिनेत्रीने प्रेक्षकांच्या हृदयात विशेष स्थान निर्माण केलं आहे.  विद्या बालनने 2005 मध्ये रिलीज झालेल्या 'परिणीता' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. यानंतर तिनं 'शेरनी', 'नो वन किल्ड जेसिका', 'भूल भुलैया' यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये तिनं काम केलं आहे. पण, आतापर्यंतचा तिचा प्रवास सोपा नव्हता. तिला एकेकाळी खूप संघर्ष करावा लागला होता.  एकदा तर तिला भीक सुद्धा मागावी लागली आहे. स्वत: विद्यानेच हा किस्सा सांगितला.

विद्या बालन हिने मुलाखतीमध्ये मोठा खुलासा केला आहे. विद्या बालन म्हणाली की, मी मुंबईच्या एका 5 स्टार हाॅटेलसमोर एकेकाळी भीक मागितली आहे. मात्र, त्यावेळी नेमके काय घडलं होतं हे तिनं सांगितलं. ती म्हणाली, 'मी 'इंडियन म्युझिक ग्रुप' नावाच्या एका ग्रुपचा भाग होतो. हा ग्रुप दरवर्षी शास्त्रीय संगीताच्या मैफली आयोजित करत असे. मी आयोजन समितीचा एक भाग होतो. समितीसोबत स्वयंसेवक असायचे. रात्री आमचे काम संपलंं की आम्ही नरिमन पॉइंटला फिरायला जायचो'. 

पुढे ती म्हणाली, 'एकदा मित्रांनी मला 'ओबेरॉय द पाम्स' येथील कॉफी शॉपमध्ये जाऊन त्यांचं दार ठोठावण्याचं आणि काही खायला मागण्याचं चॅलेंज केलं.  . मग काय मी एक अभिनेत्री होते आणि मी दार जोरात वाजवलं आणि त्यांना म्हटलं मला भूक लागली आहे. कालपासून मी काही खाल्ले नाही. मला खायला काहीतरी द्या. विशेष म्हणजे मी हे करत असताना मी अभिनेत्री आहे याचा लोकांना थांगपत्ता लागला नाही आणि मी ते चॅलेंज जिंकले'. दरम्यान विद्याच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती लवकरच 'भूल भुलैया ३'मधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :विद्या बालनबॉलिवूड