Join us  

कार्तिक आर्यनसोबतच्या ब्रेकअपवर सारा अली खाननं सोडलं मौन, म्हणाली - "शेवटी तुम्हाला..."

By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 9:26 AM

Sara Ali Khan : सारा अली खान आणि अनन्या पांडे कॉफी विथ करणच्या लेटेस्ट एपिसोडमध्ये सहभागी झाल्या होत्या. करणने साराला कार्तिक आर्यनसोबतच्या नात्याबद्दल प्रश्न विचारला, ज्यावर सारा मनमोकळेपणाने बोलली.

'कॉफी विथ करण'(Koffee With Karan)चा प्रत्येक सीझन धुमाकूळ घालत आहे. यावेळीही नेमके तेच दिसून येत आहे. या शोचा आठवा सीझन सध्या धुमाकूळ घालत आहे. दर गुरुवारी, जिजनी प्लस हॉटस्टारवर शोचा एक नवीन भाग प्रदर्शित केला जातो, जो रोमांचक खुलासे करतो. या गुरुवारी म्हणजेच आज अनन्या पांडे (Ananya Panday) आणि सारा अली खान (Sara Ali Khan) सोफ्यावर बसलेल्या दिसणार आहेत. या शोमध्ये दोघांनीही करण जोहरच्या प्रश्नांना उत्तरे दिली. इतकंच नाही तर दोन्ही सौंदर्यवतींनी त्यांचा कॉमन बॉयफ्रेंड कार्तिक आर्यनबद्दलही मोकळेपणाने बोलल्या. यादरम्यान, सारा अली खानने ब्रेकअपनंतरच्या मीटिंगबद्दल सांगितले की ते तिच्यासाठी किती कठीण होते.

थेट प्रश्न विचारण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या करण जोहरने यावेळीही साराला थेट कार्तिक आर्यनबद्दलच प्रश्न विचारला. त्याने विचारले की ब्रेकअप नंतर एकमेकांशी मैत्री करणे सोपे आहे का, कारण दोघांनी एकाच मुलाला डेट केले आहे. साराने या प्रश्नाचे उत्तर सामान्यपणे दिले आणि म्हणाली, 'हो, मला असे म्हणायचे नाही की हे सर्व सोपे आहे कारण असे म्हणणे आणखी वाईट आहे. हे नेहमीच सोपे नसते. जेव्हा तुम्ही एखाद्याशी नातेसंबंधात असता, मग ती मैत्री असो, व्यावसायिक असो किंवा रोमँटिक असो, विशेषत: जर मी असेन, तर मी नात्यात पूर्णपणे गुंतते आणि मी नात्यात गुंतवणूक करते. हे खरोखर महत्त्वाचे आहे असे नाही. आजची परिस्थिती एक गोष्ट असू शकते आणि उद्या ती काहीतरी वेगळी असू शकते... तिचा तुमच्यावर परिणाम होतो. पण शेवटी तुम्हाला त्यातून पुढे जावे लागेल.

बॉलिवूडमध्ये कोणतीही गोष्ट कायमस्वरूपी नसतेयाविषयी बोलताना सारा म्हणाली की, इंडस्ट्रीतील कोणीतरी तुमचा कायमचा मित्र असेल किंवा तुम्ही कधीही कोणाशीही बोलणार नाही, असे म्हणणे काही शहाणपणाचे नाही. साराने असेही सांगितले की, येथे कोणतीही मैत्री आयुष्यभर टिकत नाही आणि शत्रुत्वही नाही. जे आज बोलत नाहीत ते उद्या बोलू शकतात. तसेच बॉलिवूडमध्ये बेस्ट फ्रेंडशिप किंवा पिंकी प्रॉमिस असे काहीही नाही, असेही सांगितले. सारा अली खानने स्पष्ट केले की लोकांमधील मैत्री परिस्थितीनुसार बदलत राहते.

काजोल आणि करीना यांच्या मैत्रीत आला होता दुरावायावर प्रतिक्रिया देताना करण जोहरनेही खुलासा केला आणि करीना कपूर आणि काजोलसोबतही अशीच घटना घडल्याचे सांगितले. त्याने सांगितले की, एकदा करीना कपूर आणि काजोल यांच्या नात्यात कडवटपणा आला होता, पण दोघांनी ती सोडवली. आता दोघांमध्ये गोष्टी सामान्य आहेत. यावर साराने प्रतिक्रिया दिली आणि म्हणाली की, पण त्याची (करण जोहर) दोघांशी खूप चांगली मैत्री होती, कदाचित हे देखील पॅच अपचे कारण असू शकते.

टॅग्स :सारा अली खानकार्तिक आर्यनकरण जोहरकॉफी विथ करण 6