Join us  

Salman Khan Birthday Special: सलमान खान आणि ऐश्वर्या रायचे ब्रेकअप होण्यामागे हे होते कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2019 7:15 AM

सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता.

ठळक मुद्देसलमान आणि ऐश्वर्यात वाद सुरू असतानाच ऐश्वर्याला काहीही न सांगता सलमान त्याची पूर्वप्रेयसी सोमी अलीला मदत करण्यासाठी अमेरिकेला गेला आणि त्याच कारणामुळे त्यांचे ब्रेकअप झाले.

सलमान खानचा आज वाढदिवस असून सलमानला बॉलिवूडचा दबंग खान म्हटले जाते. त्याने आजवर अनेक हिट चित्रपट बॉलिवूडला दिले आहेत. त्याला चांगलेच फॅन फॉलोव्हिंग असून त्याची केवळ एक झलक पाहाण्यासाठी त्याचे फॅन्स कित्येक तास त्याच्या घराच्या समोर उभे असतात. सलमानच्या व्यवसायिक आयुष्याइतकेच त्याचे वैयक्तिक आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असते. आजवर अनेक अभिनेत्रींसोबत त्याचे नाव जोडण्यात आले आहे. 

सलमानने आज वयाची पन्नासी ओलांडली असली तरी तो अद्याप अविवाहित आहे. तो लग्न कधी करणार हा प्रश्न त्याच्या चाहत्यांना नेहमीच पडलेला असतो. सलमान खान आणि ऐश्वर्या राय यांच्या अफेअरची एकेकाळी चांगलीच चर्चा रंगली होती. ते दोघे अनेक सार्वजनिक ठिकाणी एकत्र हजेरी लावत असत. ते दोघे लग्न करणार असे वाटत असतानाच त्या दोघांमध्ये वाद झाले आणि त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय घेतला.

सलमान आणि ऐश्वर्याचे ब्रेकअप झाल्यानंतर त्यांच्या चाहत्यांना चांगलाच धक्का बसला होता. त्या दोघांनी ब्रेकअप करण्याचा निर्णय का घेतला याबाबत त्या दोघांनी नेहमीच मौन राखणे पसंत केले. संजय लीला भन्साळीच्या हम दिल दे चुके या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान ते दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले होते. सलमानसाठी तिने हम तुम्हारे है सनम या चित्रपटात पाहुण्या कलाकाराची भूमिका देखील साकारली होती. तिला अनेकवेळा सलमानच्या कुटुंबियांसोबत देखील पाहायला मिळत असे. पण ऐश्वर्याच्या कुटुंबियांना तिचे सलमानसोबत असलेले नाते पसंत नव्हते. नोव्हेंबर 2001 मध्ये सलमानने ऐश्वर्याच्या घरी जाऊन दारूच्या नशेत प्रचंड गोंधळ घातला होता. सलमानला ऐश्वर्याकडून लग्नाचे वचन हवे होते तर ऐश्वर्या लगेचच लग्न करायला तयार नव्हती. त्याने रात्री तीन वाजेपर्यंत घातलेल्या या गोंधळामुळे ऐश्वर्या प्रचंड चिडली होती. त्याने त्यावेळात ऐश्वर्याच्या वडिलांसोबत गैरवर्तुणूक केली होती असे म्हटले जाते.

सलमानने एका मुलाखतीत सांगितले होते की, आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो, त्याच व्यक्तीसोबत आपण सगळ्यात जास्त भांडतो. सलमान आणि ऐश्वर्यात वाद सुरू असतानाच ऐश्वर्याला काहीही न सांगता सलमान त्याची पूर्वप्रेयसी सोमी अलीला मदत करण्यासाठी अमेरिकेला गेला आणि त्याच कारणामुळे त्यांचे ब्रेकअप झाले असे इंडिया टूडेने त्यांच्या वृत्तात म्हटले होते.

 

टॅग्स :सलमान खानऐश्वर्या राय बच्चन