Join us  

राणी मुखर्जी अभिषेक बच्चनला समजायची फ्रेंड... पण त्याच्या मनात होतं काही तरी वेगळंच

By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2020 12:42 PM

अभिषेक बच्चन आणि राणीने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडत असे.

ठळक मुद्देराणीने काही वर्षांपूर्वी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मी अभिषेकची मैत्रीण आहे असे मला वाटत होते. पण तो मला केवळ सहकलाकार समजत होता हेच यावरून दिसून येते.

राणी मुखर्जी आणि अभिषेक बच्चन यांनी बंटी और बबली' 'युवा', 'हम तुम','बस इतना सा ख्वाब है', 'कभी अलविदा ना कहना' यांसारख्या सिनेमात काम केले आहे. त्यांची जोडी त्यांच्या चाहत्यांना प्रचंड आवडायची. त्यांची केमिस्ट्री पाहाता खऱ्या आयुष्यात देखील ते नात्यात आहेत का असा प्रश्न त्यांच्या चाहत्यांना पडत असे. मीडियात देखील त्यांच्या नात्याची त्या काळात चांगलीच चर्चा रंगली होती. एवढेच नव्हे तर ते दोघे लग्न करणार असल्याच्या चर्चांना देखील उधाण आले होते. पण अभिषेक आणि राणी या दोघांनीही या चर्चांवर मौन पाळणेच पसंत केले होते.

अभिषेक आणि राणी यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले असल्याने त्यांची खऱ्या आयुष्यात देखील चांगली मैत्री असेल असेच सगळ्यांना वाटायचे. पण अभिषेकच्या लग्नाचे आमंत्रण राणीला न मिळाल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला होता. अभिषेक आणि ऐश्वर्या राय यांचे लग्न धुमधडाक्यात पार पडले होते. बॉलिवूडमधील अनेकांनी त्यांच्या लग्नाला हजेरी लावली होती. पण राणी लग्नात न दिल्याने मीडियात देखील याची चर्चा रंगली होती.

राणीने काही वर्षांपूर्वी फिल्मफेअरला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मला अभिषेकने लग्नाला का बोलावले नाही याचे उत्तर केवळ अभिषेकच तुम्हाला देऊ शकतो... लग्नात तुम्ही केवळ तुमच्या अगदी जवळच्या व्यक्तींना बोलवता... मी अभिषेकची मैत्रीण आहे असे मला वाटत होते. पण तो मला केवळ सहकलाकार समजत होता हेच यावरून दिसून येते... कोणाला लग्नाला बोलवायचे आणि कोणाला नाही हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न असतो. त्यामुळे मी याबाबत न बोलणेच चांगले आहे... माझ्या लग्नाला देखील मी काही निवडक लोकांनाच बोलवणार असल्याचे मी ठरवले आहे.

 

टॅग्स :राणी मुखर्जीअभिषेक बच्चन