Join us  

ते सगळे मला विसरले...! बॉलिवूडच्या मित्रांबद्दल बोलली समीरा रेड्डी!!

By ऑनलाइन लोकमत | Published: May 08, 2019 2:57 PM

अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करतेय. २०१५ मध्ये समीराने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. लवकरच समीरा दुसऱ्यांदा आई होणार आहे. प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत असतानाच समीराने बॉलिवूडच्या आपल्या मित्रांबद्दल एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे.

ठळक मुद्देअभिनेत्री समीराने व्यावसायिक अक्षय वरडेसोबत लग्न केले असून अक्षयचा मोटरसायकल कस्टमायजेशनचा व्यवसाय आहे.

अभिनेत्री समीरा रेड्डी सध्या प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करतेय. २०१५ मध्ये समीराने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. लवकरच समीरा दुसऱ्यांदा आई होणार आहे. प्रेग्नंसी पीरियड एन्जॉय करत असतानाच समीराने बॉलिवूडच्या आपल्या मित्रांबद्दल एक मोठा आणि धक्कादायक खुलासा केला आहे.२०१२ मध्ये प्रदर्शित ‘तेज’ या चित्रपटात समीरा शेवटची झळकली होती. या चित्रपटात तिच्याशिवाय अजय देवगण, बोमण ईराणी व अनिल कपूर हे कलाकार मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटानंतर समीरा बॉलिवूडपासून दूर झाली आणि बॉलिवूडच्या मित्रांनाही दुरावली.

अलीकडे एका मुलाखतीत, समीरा याबद्दल बोलली. ‘बॉलिवूड लाईमलाईटपासून दूर झाले आणि बॉलिवूडचे माझे सगळे मित्र दुरावले. गेल्या अनेक वर्षांत ना कुणी माझी आठवण काढली, ना कुणी माझ्याशी बोलले. प्रत्येक जण मला विसरला. आता बॉलिवूडचा एकही मित्र वा मैत्रिण माझ्या संपर्कात नाही. आता मलाही त्यांच्यासोबत राहण्यात कुठलाही रस राहिलेला नाही. एकेकाळी मला स्वत:बद्दल असुरक्षित वाटू लागले होते. मी प्रचंड घाबरले होते. पण माझ्यासोबत काय झाले, मी बॉलिवूड का सोडले, हे विचारण्याची साधी तसदीही कुणी घेतली नाही. अर्थात मला आता त्याची पर्वा नाही. मी माझ्या संसारात आनंदी आहे,’असे समीरा यावेळी म्हणाली.

यापूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत समीरा तिच्या पहिल्या मुलाच्या जन्मावेळीच्या स्थितीबद्दल बोलली होती. लग्नानंतर दोनच महिन्यांत मी पहिल्यांदा प्रेग्नंट राहिले. त्यामुळे तो काळ माझ्यासाठी कठीण होता. पहिल्या मुलाच्या जन्मावेळी माझे वजन खूप वाढले होते. ते कमी करायला मला खूपवेळ लागला. कधीकाळी मी सुद्धा करिनासारखी हॉट होते. पण मी प्रत्येकवेळी ग्लॅमरस दिसू शकत नाही, असे समीरा म्हणाली होती.

अभिनेत्री समीराने व्यावसायिक अक्षय वरडेसोबत लग्न केले असून अक्षयचा मोटरसायकल कस्टमायजेशनचा व्यवसाय आहे. समीराला बाईक चालवण्याचा छंद आहे. ती अक्षयच्या कंपनीने मॉडिफाय केलेल्या बाईक चालवायची. एक दिवस ती अक्षयला भेटली आणि दोघांमध्ये मैत्री झाली व मैत्रीचे रुपांतर प्रेमात झाले.

टॅग्स :समीरा रेड्डी