Join us  

SHOCKING!! ‘दोस्ताना 2’नंतर कार्तिक आर्यनने गमावला आणखी एक सिनेमा? जान्हवी कपूर ठरली कारण?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 10:05 AM

Kartik Aaryan : वाचा काय आहे भानगड? कार्तिक आर्यनला कशाची मिळतेय शिक्षा?

करण जोहरसोबत वाजलं अन् कार्तिक आर्यनच्या  (Kartik Aaryan) हातून ‘दोस्ताना 2’  (Dostana 2) हा सिनेमा निसटला. असं म्हणतात की, जान्हवी कपूरसोबतच्या (Janhvi Kapoor) वादामुळे कार्तिकने स्वत: ‘दोस्ताना 2’ हा सिनेमा सोडला होता. आता काय खरं, काय खोटं कळायला मार्ग नाही. पण होय, आता कार्तिकने आणखी एक सिनेमा हातचा गमावल्याचं कळतंय. तुम्हाला माहित असेलंच की, करण जोहरने नुकतीच ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेज माही’ ( Mr and Mrs Mahi )या नव्या चित्रपटाची घोषणा केली आहे. या चित्रपटासाठी आधी कार्तिकचं नाव फायनल झालं होतं. पण आता तो या चित्रपटातूनही बाद झाला असून त्याच्याजागी जान्हवी कपूरसोबत राजकुमार राव याची वर्णी लागली आहे.

सूत्रांचे मानाल तर, ‘दोस्ताना 2’मधून काढल्यानंतर कार्तिकला ‘मिस्टर अ‍ॅण्ड मिसेज माही’ या चित्रपटातूनही बाहेरचा रस्ता दाखवला गेला.याचवर्षी मे महिन्यात ‘दोस्ताना 2’मधून कार्तिकची हकालपट्टी करण्यात आली होती. विशेष म्हणजे, या चित्रपटाचं 60 टक्के शूटींग पूर्ण झालं होतं. त्यावर कोट्यवधी रूपये खर्च झाले होते. पण त्याची पर्वा न करता अचानक कार्तिकचा पत्ता कट करण्यात आला.

चर्चा खरी मानाल तर, कार्तिकचा जान्हवी कपूरसोबत वाद झाला होता. या वादानंतर कार्तिक तिच्यासोबत काम करू इच्छित नव्हता. त्याआधीपर्यंत कार्तिक व जान्हवी दोघांमध्येही चांगली मैत्री होती. पण जानेवारी महिन्यात का कुणास ठाऊक दोघांचं बिनसलं. ‘दोस्ताना 2’च्या शूटींगवरही त्यांच्या भांडणाचा परिणाम जाणवायला लागला होता. अखेर करण जोहरने कार्तिकला या चित्रपटातून काढून टाकण्याचा निर्णय घेतला होता. या संपूर्ण घडामोडीनंतर ताज्या माहितीनुसार, ‘दोस्ताना 2’ची स्क्रिप्ट बदलण्यात आली आहे. अक्षय कुमार आता या सिनेमाचा भाग बनू शकतो. अर्थात अद्याप मेकर्सनी याबाबतची अधिकृत घोषणा केलेली नाही.

टॅग्स :कार्तिक आर्यनजान्हवी कपूरकरण जोहर