Join us  

एकेकाळी सलमान खानच्या अगदी जवळचे असलेले हे दोन कलाकार दिसले नाहीत भारतच्या प्रिमियरला

By ऑनलाइन लोकमत | Published: June 07, 2019 6:00 AM

सलमान खानच्या भारत या चित्रपटाचे प्रिमियर काल धुमधडाक्यात पार पडले. या प्रिमियरला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती.

ठळक मुद्देभारतच्या प्रिमियरला मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर कुठेच दिसले नाहीत. मलायका आणि अर्जुनसोबत एकेकाळी सलमान खानचे खूपच चांगले संबंध होते.

सलमान खान आणि कतरिना कैफची मुख्य भूमिका असलेला भारत हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटाची कथा तर प्रेक्षकांना आवडत आहे. पण त्याचसोबत या चित्रपटात सलमान आणि कतरिना यांनी खूप चांगला अभिनय केला असल्याचे प्रेक्षकांचे म्हणणे आहे. तसेच या चित्रपटातील सलमान आणि कतरिनाच्या केमिस्ट्रीची देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. सलमानच्या या चित्रपटाला खूप चांगले ओपनिंग मिळाले असून त्याबाबत त्याने आपल्या फॅन्सचे ट्वीटरद्वारे आभार देखील मानले आहेत.

 

सलमान खानच्या भारत या चित्रपटाचे प्रिमियर काल धुमधडाक्यात पार पडले. या प्रिमियरला बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी हजेरी लावली होती. सलमान देखील या प्रिमियरला उपस्थित होता. सलमान प्रिमियरला येणार आहे हे कळताच त्याच्या चाहत्यांनी चित्रपटगृहाभोवती प्रचंड गर्दी केली होती. लहान मुलांपासून वयस्क लोकांपर्यंत सगळेच सलमानची एक झलक पाहाण्यासाठी चित्रपटगृहाच्या बाहेर उभे होते. 

सलमानच्या भारत या चित्रपटाच्या प्रिमियरला अनेक बॉलिवूडमधील सेलिब्रेटी देखील दिसले. सुनील शेट्टी, अनिल कपूर, तब्बू, बॉबी देओल, सनी लिओनी, संजय लीला भन्साळी, महेश मांजरेकर, टायगर श्रॉफ, क्रिती सेनन, जान्हवी कपूर, अनन्या पांडे यांसारखे अनेक स्टार प्रिमियरला उपस्थित होते. पण या सगळ्यांमध्ये मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर कुठेच दिसले नाहीत.

मलायका आणि अर्जुनसोबत एकेकाळी सलमान खानचे खूपच चांगले संबंध होते. मलायकाचे लग्न सलमानचा भाऊ अरबाजसोबत झाले होते. पण काहीच महिन्यांपूर्वी त्या दोघांनी घटस्फोट घेतला आणि सध्या ती अर्जुन कपूरसोबत नात्यात आहे. अर्जुनला बॉलिवूडमध्ये येण्यासाठी सलमाननेच मार्गदर्शन दिले होते. पण अर्जुन आणि मलायकाच्या अफेअरनंतर अर्जुन कधीच सलमानसोबत दिसला नाही. या सगळ्यामुळे अर्जुन आणि मलायका भारतच्या प्रिमियरला दिसले नाहीत अशी चर्चा रंगली आहे.

भारत या चित्रपटात सलमान आणि कतरिनासोबतच जॅकी श्रॉफ, सुनील ग्रोव्हर आणि दिशा पटानी यांच्या मुख्य भूमिका आहेत. 

टॅग्स :भारत सिनेमासलमान खानकतरिना कैफअर्जुन कपूरमलायका अरोरा