Join us

​आलियावर भडकली नीतू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2016 17:49 IST

बिहारची मुलगी असलेली अभिनेत्री नीतू चंद्रा हिनेही आलिया भट्ट आणि ‘उडता पंजाब’चे दिग्दर्शक अभिषेक चौबे यांना एक खुले पत्र ...

बिहारची मुलगी असलेली अभिनेत्री नीतू चंद्रा हिनेही आलिया भट्ट आणि ‘उडता पंजाब’चे दिग्दर्शक अभिषेक चौबे यांना एक खुले पत्र लिहिले आहे. अभिषेक चौबे यांच्या चित्रपटातील आलियाची भूमिका बिहारची प्रतीमा मलीन करणारी असल्याचे नीतूला वाटते. त्यामुळेच ती दु:खी आहे. यापूर्वीही आलियाला या संदर्भात एक खुले पत्र मिळाले होते. यावर आलियाने प्रतिक्रियाही दिली होती. तूर्तास नीतू चंद्राच्या खुल्या पत्रावर आलियाने कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही. नीतूने आलियाला लिहिलेल्या पत्राचा हा सारांश.. गत काही वर्षांत हिंदी सिनेमात बिहारींना ज्याप्रमाणे दाखवले जात आहे, ते बघून मी व्यथित आहे. ताजे उदाहरण म्हणजे आलिया भट्टचा ‘उडता पंजाब’.  डायरेक्टर अभिषेक चौबे यांनी ‘उडता पंजाब’च्या प्रमोतून बिहारींची रूढीवादी प्रतिमाच दाखवली आहे. चित्रपटात आलिया एका बिहारी मुलीच्या भूमिकेत आहे, जी पंजाबात ड्रग्जच्या आहारी जाते. हे पाहून मी दु:खी आहे. प्रकाश झा, हेही आपल्या बहुतांश चित्रपटात बिहारींना रूढीवादी, भ्रष्ट, गँगस्टर्स असेच सादर करतात. बिहारला कायम सर्वाधिक गुन्हेगारी असलेले राज्य अशाच रूपात चित्रपटात दाखवले जाते. बिहारवर आधारित चित्रपटात केवळ अपहरण, हत्या, दरोडा हेच दाखवले जाते. भारताचे पहिले राष्ट्रपती राजेन्द्र प्रसाद, शहनाई वादक बिस्मिल्लाह खान अशा अनेक व्यक्ति बिहारनेच भारताला दिल्या आहेत. यावर कुठल्याही दिग्दर्शकाला सिनेमा का बनवावा, असे का वाटत नाही?  टीव्ही वा चित्रपटात बिहारींची कितीही टर उडवली, तरी आपल्याला कुणी रोखणारे नाही, कदाचित असे या दिग्दर्शकांना वाटत असावे?