Join us  

रणबीर कपूरसोबतच्या झालेल्या ब्रेकअपवर दोन वर्षानंतर असे काही बोलली कॅटरिना कैफ

By ऑनलाइन लोकमत | Published: December 04, 2018 11:55 AM

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या दोन्ही गोष्टी काही नवीन नाहीत. रोज नवीन रिलेशनशिप आणि ब्रेकअपच्या चर्चा होतच असतात. दीपिका पादुकोणशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरचे सूत जुळले ते कॅटरिना कैफशी.

ठळक मुद्देकॅटरिनाने रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर तिच्या आयुष्यात काय बद्दल झाले याबाबतचा खुलासा केलाकॅट लवकरच आपल्याला सलमान खानसोबत भारत सिनेमात दिसणार आहे

बॉलिवूडमध्ये ब्रेकअप आणि पॅचअप या दोन्ही गोष्टी काही नवीन नाहीत. रोज नवीन रिलेशनशिप आणि ब्रेकअपच्या चर्चा होतच असतात. दीपिका पादुकोणशी ब्रेकअप झाल्यानंतर रणबीर कपूरचे सूत जुळले ते कॅटरिना कैफशी. सलमान खानसोबत दुरावा आल्यानंतर कॅटने रणबीरचा हात धरला. दोघे लिव्ह-इन रिलेशनशीपमध्ये राहायला लागले. ब्रेकअपनंतर दोघांनी या नात्याबाबत काहीच भाष्य केले नाही. 

नुकताच एका मुलाखतीत कॅटरिना कैफने रणबीरसोबतच्या ब्रेकअपनंतर तिच्या आयुष्यात काय बद्दल झाले याबाबतचा खुलासा केला. कॅटरिना म्हणाली, ''रणबीरसोबत झालेल्या ब्रेकअपनंतर मी संपूर्ण लक्ष माझ्या करिअरकडे दिले. तो काळ माझ्यासाठी कठीण होता. वेळेने मला बऱ्याच गोष्टी शिकवल्या. मी त्या कठीण काळातून बरेच काही शिकले. आता माझा आयुष्याकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलला आहे'''     

कॅट लवकरच आपल्याला सलमान खानसोबतभारत सिनेमात दिसणार आहे. अली अब्बास या सिनेमाचे दिग्दर्शन करतोय. मिळालेल्या माहितीनुसार मेकर्सने लुधियानामध्ये वाघा बॉर्डर हुबेहुब सेट उभारण्यात आला आहे.

 

सिनेमाची कथा १९४७ म्हणजे, भारत-पाक फाळणीच्या काळापासून सुरु होईल. भारत नावाच्या एका सामान्य व्यक्तिची कथा यात दिसेल. मी परतलो नाही तर तू कुटुंबाचा सांभाळ करशील, असे भारतचे वडिल फाळणीच्या काळात स्थलांतर करताना भारतला सांगतात. या कथेत भारतचा ५० वर्षांचा प्रवास दाखवला जाणार असल्याने प्रत्येक दहा वर्षांच्या अंतराने सलमानचे लूक बदलताना दिसेल.  

टॅग्स :कतरिना कैफरणबीर कपूरसलमान खानभारत सिनेमा