Join us  

तीन अफेअर आणि दोन लग्नानंतरही हा अभिनेता उतारवयात आहे एकटा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2019 9:00 PM

या अभिनेत्याच्या व्यवसायिक आयुष्याइतके त्याचे खाजगी आयुष्य नेहमीच चर्चेत राहिले आहे.

ठळक मुद्देश्रीविद्या, वाणी गणपती, सारिका, गौतमी, सिमरन बग्गा यांसारख्या अभिनेत्रींसोबतचे कमल हासन यांचे नाते चांगलेच गाजले आहे. त्यातील वाणी आणि सारिका यांच्यासोबत त्यांनी लग्न देखील केले होते.

कमल हासन हा दाक्षिणेतील सुपरस्टार आहे. त्याने केवळ दक्षिणेतच नव्हे तर बॉलिवूडमध्ये देखील त्याचे प्रस्थ निर्माण केले आहे. कमल हासनच्या चित्रपटांइतकेच त्याचे खाजगी आयुष्य देखील नेहमीच चर्चेत असते. कमल हासनदेखील त्यांच्या आयुष्याविषयी नेहमीच मीडियात भरभरून बोलतात. त्यांच्या आयुष्यात आजवर अनेक स्त्रिया आल्या असल्या तरी त्यांना कोणत्याही नात्यात यश मिळालेले नाहीये.

श्रीविद्या, वाणी गणपती, सारिका, गौतमी, सिमरन बग्गा यांसारख्या अभिनेत्रींसोबतचे कमल हासन यांचे नाते चांगलेच गाजले आहे. त्यातील वाणी आणि सारिका यांच्यासोबत त्यांनी लग्न देखील केले होते. लग्नसंस्थेवर त्यांचा विश्वासच नाही असे कमल हासन यांनी पिंकव्हिलाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते. त्यांनी सांगितले होते की, लोक केवळ दबावामुळे लग्न करतात असे मला वाटते. माझ्या मनात असते तर मी कधीच लग्न केले नसते. केवळ माझ्या आयुष्यात असलेल्या स्त्रियांच्या इच्छेसाठी मी लग्न केले. वाणीला लीव्ह इन मध्ये राहायचे नव्हते तर सारिका आणि मला दोन मुली झाल्यानंतरही हॉटेल रूम बुक करता येत नव्हती म्हणून आम्ही लग्न केले. 

कमल हासन आणि श्रीविद्या यांचे अफेअर सत्तरीच्या दशकात चांगलेच गाजले होते. श्रीविद्या त्यांच्यापेक्षा दोन वर्षांनी मोठी होती. त्या दोघांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. पण श्रीविद्या यांनी जॉर्ज थॉमस या मल्याळम चित्रपटसृष्टीतील असिस्टंट दिग्दर्शकासोबत लग्न केले आणि या अफेअरला पूर्णविराम मिळाला. श्रीविद्या यांच्या शेवटच्या क्षणी कमल यांनी त्यांची रुग्णालयात जाऊन भेट घेतली होती. थिराक्कथा हा चित्रपट त्यांच्या प्रेमकथेवर बेतलेला आहे.

श्रीविद्या यांच्यासोबत ब्रेकअप झाल्यानंतर कमल प्रसिद्ध डान्सर वाणी गणपती यांच्या प्रेमात पडले. त्या दोघांची भेट झाल्यानंतर काहीच वर्षांत त्यांनी लग्न केले. कमल हासन यांना लग्न करायचे नव्हते. पण वाणी लीव्ह इन मध्ये राहायला तयार नव्हत्या. त्यामुळे त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या लग्नानंतर काहीच वर्षांत सारिका कमल हासन यांच्या आयुष्यात आल्या आणि ते दोघे लीव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहू लागले. त्यांना लग्नाआधीच दोन मुली होत्या.

मुलींच्या जन्मानंतर त्यांनी लग्न केले. वाणी आणि कमल हासन दोघे अनेक वर्षांपूर्वी वेगळे झाले असले तरी त्यांनी घटस्फोट घेतला नव्हता. त्यांनी 2002 मध्ये घटस्फोट घेतला. तोपर्यंत सारिका आणि कमल हासन यांच्यात सगळे काही सुरळीत सुरू होते. पण सारिका यांची बेस्ट फ्रेंड गौतमी आणि सिमरन बग्गा या अभिनेत्रीसोबत कमल हासन यांचे त्यावेळी नाव जोडले गेले आणि सारिका यांनी 2004 मध्ये घटस्फोट घेतला. त्याकाळात सारिका ड्रिप्रेशनमध्ये गेल्या होत्या. त्यांनी आत्महत्या करण्याचा देखील प्रयत्न केला असल्याचे म्हटले जाते. 

सिमरन आणि कमल यांच्यामध्ये जवळजवळ 22 वर्षांचे अंतर होते. पण तरीही ते दोघे एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडालेले होते. त्या दोघांची 2000 मध्ये ओळख झाली होती. पण काहीच वर्षांत त्या दोघांनी वेगळे व्हायचा निर्णय घेतला आणि सिमरनने लग्न केले. 

सिमरन आयुष्यातून गेल्यानंतर गौतमी आणि कमल हासन एकत्र राहायला लागले. तेरा वर्षं लीव्ह इन मध्ये राहिल्यानंतर 2016 मध्ये त्या दोघांनी वेगळे व्हायचे ठरवले. 

 

टॅग्स :कमल हासन