Join us  

दिया मिर्झापाठोपाठ मोडला आणखी एक संसार, ‘या’ सेलिब्रिटी कपलनेही घेतला विभक्त होण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: August 01, 2019 3:40 PM

दिया मिर्झापाठोपाठ आणखी एका सेलिब्रिटी कपलने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे.

ठळक मुद्देकनिका ढिल्लनने  ‘जजमेंटल है क्या’चे दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुडी यांच्यासोबत लग्न केले होते. पण आता हे कपल विभक्त झाले आहे.

बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झाने  पती साहिल संघापासून विभक्त होण्याची घोषणा केली आणि सगळ्यांनाच धक्का बसला. खुद्द दियाने सोशल मीडियावर पोस्ट लिहित  विभक्त होण्याचा निर्णय जगजाहिर केला. अकरा वर्षे सोबत राहिल्यानंतर परस्पर सहमतीने हा निर्णय घेण्यात आल्याचे दियाने या पोस्टमध्ये लिहिले. दिया मिर्झापाठोपाठ आणखी एका सेलिब्रिटी कपलने विभक्त होण्याचा निर्णय घेतला आहे. होय, हे कपल म्हणजे कनिका ढिल्लन आणि प्रकाश कोवेलामुडी.

 दोन्ही नावे तुम्ही ऐकली असतील. कंगना राणौतच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘जजमेंटल है क्या’ या सिनेमाचे दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुडी यांनी केले होते. तर कनिका ढिल्लन या चित्रपटाची लेखिका होती. म्हणजेच या चित्रपटाची कथा तिने लिहिली होती. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटात एक छोटीशी भूमिकाही केली होती. स्पॉटबॉयने याबद्दलचे वृत्त दिले आहे.

कनिका ढिल्लनने  ‘जजमेंटल है क्या’चे दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुडी यांच्यासोबत लग्न केले होते. पण आता हे कपल विभक्त झाले आहे. खुद्द प्रकाश यांनी स्पॉटबॉयला दिलेल्या मुलाखतीत या वृत्ताला दुजोरा दिला आहे.प्रकाश व कनिका यांनी हा निर्णय अचानक घेतला नाही. दोन वर्षांपूर्वीच त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. पण याचदरम्यान  ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटाचे काम सुरु झाले.

कनिकाच्या मते, कधी काय झाले, याला काहीही अर्थ नाही. आम्ही विभक्त झालो असलो तरी आजही चांगले मित्र आहोत.प्रकाश यांनी सांगितले की, आम्ही  ‘जजमेंटल है क्या’साठी एकत्र काम केले. यादरम्यान आम्ही खूप चांगले वेळ घालवला. यापुढेही संधी मिळेल तेव्हा आम्ही एकत्र काम करू. 

टॅग्स :कंगना राणौतमेंटल है क्या