Join us  

बॉलिवूड सिनेमाप्रमाणे रोमाँटिक आहे दिया मिर्झा आणि साहिलची लव्हस्टोरी, मात्र तरीही झाले विभक्त

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2020 8:00 PM

दियाने 2000 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब मिळवला. त्यानंतर ती मिस एशिया पॅसिफिक बनली.

अभिनेत्री दिया मिर्झा कोणत्याना कोणत्या कारणामुळे सोशल मीडियावर नेहमीच चर्चेत असते.  दियाने 2000 मध्ये फेमिना मिस इंडियाचा किताब मिळवला. त्यानंतर ती मिस एशिया पॅसिफिक बनली. मिस एशिया पॅसिफिक बनल्यानंतर तिला अनेक चित्रपटांच्या ऑफर येत होत्या.रहेना है तेरे दिल में मधून तिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. आज आम्ही तुम्हाला दियाच्या पर्सनल लाईफबाबत काही गोष्टी सांगणार आहोत. ज्या तुम्हाला माहिती नसतील. दियाने दियाचे 2014 मध्ये साहिल संघासोबत लग्न केले होते. मात्र हे लग्न फारकाळ टिकले नाही. दिया आणि साहिल दोघे ही फिल्म इंडस्ट्रीतून आहेत. दोघांची पहिली ओळख 2009 मध्ये झाली होती ज्यावेळी एका सिनेमाची स्क्रिप्ट घेऊन साहिल दियाच्या घरी गेला होता. त्या छोट्याशा भेटीत साहिलला पाहून दियाच्या मनाची तार छेडली. त्यानंतर दोघांच्या भेटीगाठी सुरु झाल्या. ब्रुकलेन ब्रिजवर साहिलने दियाला प्रपोज केले होते.

दिया आणि साहिल एका अॅवॉर्ड फंक्शनसाठी न्यूयॉर्कला गेले होते. याच दरम्यान दोघे ब्रुकलेन ब्रिजवर फिरत होते, ज्याठिकाणी मोठ्या प्रमाणात कपल्स सनसेट बघायला येतात. पुलाच्या मधोमध साहिल घुडग्यांवर बसला आणि दियाला प्रपोज केले. दियानेही क्षणाचा विलंब न करता साहिलला होकार दिला. लगेचच साहिलने दियाच्या हातात रिंग घातली. यावेळी ब्रुलकेन ब्रिजवर हजर असलेल्या सगळ्या कपल्सनी दोघांना उभं राहून, टाळ्या वाजवून चिअरअप केले. दोघांच्या लग्नाचे सेलिब्रेशन चक्क चार दिवस चालले होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार दीया मिर्झाचं लग्न तुटण्यामागे कनिका ढिल्लन कारणीभूत असल्याचं बोललं जातं. कनिका ढिल्लनचं दीया मिर्झाचा नवरा साहिलसोबत अफेयर आहे. ज्यामुळे दीया नवऱ्यापासून वेगळे झाले. दीया मिर्झाला कनिका व साहिल सांगा यांच्या अफेयरबद्दल समजलं होतं. त्यानंतर तिने विभक्त होण्याचा निर्णय घेतला.

टॅग्स :दीया मिर्झा