Join us  

बॉलिवूडच्या आणखी एका जोडप्याचे शुभमंगल सावधान, कनिका व हिमांशुने बांधली लग्नगाठ

By ऑनलाइन लोकमत | Published: January 05, 2021 10:31 AM

कनिकाने लग्नाचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत.

ठळक मुद्देकनिका ढिल्लन हिने केदारनाथ व मनमर्जियां यासारख्या चित्रपटांच्या कथा लिहिल्या. हिमांशुनेही रांझणा, तनु वेड्स मनु आणि झीरो यासाख्या सिनेमाच्या पटकथा रचल्या.

बॉलिवूडचे दोन मोठे रायटर्स कनिका ढिल्लन आणि हिमांशु शर्मा अखेर लग्नबंधनात अडकले. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये दोघांचा साखरपुडा पार पडला होता. कनिकाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नाचे काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यानंतर या नवविवाहित जोडप्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतोय. कनिकाचे हे दुसरे लग्न आहे.

2021 ची सुरुवात हिमांशु शर्मासोबत..., असे कॅप्शन देत कनिकाने लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. या फोटोत कनिका पिंक कलरच्या आऊटफिटमध्ये आहे तर हिमांशुने पांढरा कुर्ता-पायजमा व सोबत नेहरू जॅकेट कॅरी केले आहे. अगदी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा लग्नसोहळा पार पडला.

कनिका ढिल्लन हिने केदारनाथ व मनमर्जियां यासारख्या चित्रपटांच्या कथा लिहिल्या. हिमांशुनेही रांझणा, तनु वेड्स मनु आणि झीरो यासाख्या सिनेमाच्या पटकथा रचल्या. 2019 मध्ये दोघांनी एकमेकांना डेट करणे सुरु केले होते.

गेल्यावर्षी जूनमध्ये दोघांनी आपले नाते जगजाहिर केले होते. यापूर्वी हिमांशू शर्मा अभिनेत्री स्वरा भास्करसोबत रिलेशनशिपमध्ये होता. लवकरच हिमांशूने लिहिलेला ‘अतरंगी रे’ हा सिनेमा रिलीज होणार आहे. यात अक्षय कुमार, सारा अली खान व धनुष मुख्य भूमिकेत आहेत.

कनिका ढिल्लनने  ‘जजमेंटल है क्या’चे दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुडी यांच्यासोबत लग्न केले होते. 2019मध्ये दोघांचा घटस्फोट झाला होता.  कंगना राणौतच्या ‘जजमेंटल है क्या’ या सिनेमाचे दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुडी यांनी केले होते. तर कनिका या चित्रपटाची लेखिका होती. म्हणजेच या चित्रपटाची कथा तिने लिहिली होती. केवळ इतकेच नाही तर या चित्रपटात तिने एक छोटीशी भूमिकाही केली होती. 

टॅग्स :बॉलिवूड