Join us  

Anushka Sharma-Virat Kohli यांच्यात आला दुरावा...! फोटो पोस्ट करत व्यक्त केल्या भावना

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2021 7:24 PM

युएईमध्ये टी -20 विश्वचषक स्पर्धा होत आहे. यासाठी विराट कोहली भारतीय संघासह तेथेच आहे. अनुष्काने दुबईच्या हॉटेलचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत.

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि तिचा पती विराट कोहली यांच्यात दुरावा आला आहे. खुद्द अनुष्का शर्मानेच ही माहिती एका पोस्टद्वारे दिली आहे. या दुराव्याचे कारण आहे क्वारंटाईन. खरे तर, अनुष्का शर्मा पती विराट कोहलीला प्रोत्साहन देण्यासाठी दुबईला पोहोचली आहे. मात्र, तिला क्वारंटाईन राहावे लागत आहे. अशात तिने विराटचे काही फोटो शेअर करत तिची अवस्था सांगितली आहे. (Anushka Sharma shares glimpses of her quarantine life)

अनुष्कानं शेअर केला फोटो -युएईमध्ये टी -20 विश्वचषक स्पर्धा होत आहे. यासाठी विराट कोहली भारतीय संघासह तेथेच आहे. अनुष्काने दुबईच्या हॉटेलचे काही फोटो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. अनुष्का या हॉटेलमध्ये थांबली असून क्वारंटाईन आहे. अनुष्काच्या पोस्टमध्ये विराट कोहली बाल्कनीत आणि हॉटेलच्या लॉनवर उभा राहून तिला 'हाय' करताना दिसत आहे.

अनुष्काने फोटोंच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, "मी या दोन पैकी एक कॅप्शन निवडू शकले नाही - क्वारंटाईन आपल्या हृदयाला आणखी प्रेमळ बनवते आणि बबल असलेल्या जीवनात प्रेम. आपल्याला समजलेच असेल." अनुष्काची ही पोस्ट चाहते लाइक करत आहेत. याचबरोबर सेलेब्सदेखील त्यावर प्रतिक्रिया देत आहेत. अनुष्का शर्माच्या पोस्टवर रणवीर सिंह, सानिया मिर्झासह इतर स्टार्सनीही कमेंट केल्या आहेत.

अनुष्का शर्मा आणि विराट कोहली यांनी 11 डिसेंबर 2017 रोजी इटलीमध्ये लग्न केले. अनुष्का शर्माच्या प्रोजेक्ट्सबद्दल बोलायचे झाल्यास, ती 2018मध्ये 'झिरो' या चित्रपटात दिसली होती. आता ती जाहिरातींमध्ये काम करत आहे आणि चित्रपट आणि सीरीजच्या प्रोडक्शनमध्ये व्यस्त आहे. 

टॅग्स :अनुष्का शर्माविराट कोहलीदुबईबॉलिवूड