Join us  

४० वर्षानंतर बिग बींना करायचं होतं रेखासोबत काम; 'या' कारणामुळे अपूर्ण राहिली इच्छा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2021 12:14 PM

Amitabh bachchan: अमिताभ बच्चन आणि रेखा या जोडीच्या आयुष्यात आलेले चढउतार साऱ्यांनाच ठावूक आहे.

ठळक मुद्देअसंख्य सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या जोडीचा 'सिलसिला'(silsila movie) हा अखेरचा चित्रपट ठरला.

बॉलिवूडमध्ये (bollywood) आजपर्यंत अनेक हिट जोड्या पाहायला मिळाल्या आहेत. अगदी ७०-८० च्या काळापासून काही जोड्यांनी प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. ऑन स्क्रीनवर उत्तम केमिस्ट्री जमणाऱ्या काही जोड्यांना रिअल लाइफमध्ये सुद्धा एकत्र पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती. मात्र, काही कारणास्तव या जोड्या विभक्त झाल्या. त्यातलीच एक जोडी म्हणजे अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि रेखा (rekha) या जोडीच्या आयुष्यात आलेले चढउतार साऱ्यांनाच ठावूक आहे. एकेकाळी त्यांच्या प्रेम प्रकरणाच्या असंख्या चर्चा रंगल्या होत्या. आजही प्रेक्षकांमध्ये या जोडीच्या नात्यावर कुजबूज केली जाते. असंख्य सुपरहिट चित्रपट देणाऱ्या या जोडीचा 'सिलसिला'(silsila movie) हा अखेरचा चित्रपट ठरला. या चित्रपटानंतर ही जोडी पुन्हा कधीच एकत्र झळकली नाही. मात्र, या चित्रपटाला ४० वर्ष पूर्ण झाल्यानंतर एका मुलाखतीत बिग बींनी रेखासोबत काम करण्याची इच्छा व्यक्त केली होती.  

‘अनजाने’, ‘आलाप’, ‘खून पसीना’, ‘गंगा की सौगंध’, ‘मुकद्दर का सिकंदर’ अशा असंख्य चित्रपटांमध्ये ही जोडी एकत्र झळकली होती. विशेष म्हणजे या जोडीवर प्रेक्षकांनी भरभरुन प्रेम केलं होतं. त्यामुळेच ते ऑफ स्क्रीनदेखील एकत्र यावेत अशी चाहत्यांची मनापासून इच्छा होती. मात्र, काही कारणास्तव या जोडीमध्ये दुरावा झाला आणि ते विभक्त झाले. या दोघांची मुख्य भूमिका असलेला 'सिलसिला' हा चित्रपट तुफान गाजला होता. पण, त्यांचा हा अखेरचा चित्रपट ठरला. विशेष म्हणजे या चित्रपटानंतर बिग बींना रेखासोबत काम करायचं होतं. आज रेखाचा  ६७ वा वाढदिवस आहे. त्यामुळेच बिग बींची तिच्यासोबत चित्रपटात झळकण्याची इच्छा अपूर्ण का राहिली ते जाणून घेऊयात.

रितेश देशमुखला पडला बिग बींचा विसर; kbc च्या मंचावर झाला जेनेलिया सोबत रोमँटिक

 'एनडीटीव्ही'च्या वृत्तानुसार, येत्या काळात रेखासोबत पुन्हा काम करायला आवडेल का? असा प्रश्न अमिताभ बच्चन यांना विचारण्यात आला होता. यावेळी कोणतेही आढेवेढे न घेता किंवा न चिडता त्यांनी शांतपणे उत्तर दिलं.

"आजकाल चित्रपटांच्या स्क्रिप्ट फारशा चांगल्या मिळत नाहीयेत. पण जर चांगली स्क्रिप्ट मिळाली तर नक्कीच रेखासोबत पुन्हा काम करायला आवडेल", असं उत्तर बिग बींनी दिली.

दरम्यान, अमिताभ आणि रेखा यांच्या नात्यात दुरावा आल्यानंतर रेखाने १९९० मध्ये व्यावसायिक मुकेश अग्रवाल यांच्याशी लग्न केल्याचं म्हटलं जातं. परंतु, मुकेश यांना मानसिक आजार असल्यामुळे रेखाने त्यांच्यापासून विभक्त होण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर मुकेश यांनी आत्महत्या केली. या दोघांचं लग्न केवळ ७ महिने टिकलं.

 

टॅग्स :रेखाअमिताभ बच्चनसिनेमासेलिब्रिटी