Join us  

आमिर खानने सर्वांसमोर किरण रावला केलं किस अन्...; दोघांच्या घटस्फोटानंतर रंगलीय त्या 'किस्स्या'ची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2021 1:43 PM

आमिर खान आणि किरण राव यांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे.

मुंबई: बॉलिवूडमधील आदर्श जोडी समजले जाणारे आमिर खान (Aamir Khan) आणि किरण राव (Kiron Rao) यांनी घटस्फोटाचा निर्णय घेतला आहे. आपल्या १५ वर्षांच्या सुखी संसारानंतर त्यांनी हा निर्णय घेतला असून त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. किरण राव ही आमिर खानची दुसरी पत्नी होती. या दोघांनी अनेक चित्रपटांच्या प्रोजेक्टवर आणि पाणी फाऊंडेशन तसेच इतरही अनेक प्रोजेक्टवर एकत्रित काम केलं आहे. आम्ही दोघं विभक्त होत असलो तरी एक पालक आणि परिवार म्हणून आम्ही एकत्रित राहू असं आमिर आणि किरण राव यांनी म्हटलं आहे. 

आमिर खान आणि किरण राव यांनी एक संयुक्त निवेदन प्रसिद्ध केलं आहे. त्यामध्ये म्हटलं आहे की, "१५ वर्षाच्या सुंदर संसारामध्ये आम्ही सुख, समाधान, आनंदाचे अनेक क्षण अनुभवले. विश्वास, आदर आणि प्रेम यामुळे आमचे संबंध सुंदर होत गेले. आता एक पती आणि पत्नीची जबाबदारी दूर सारुन आम्ही पालक आणि एक परिवाराच्या माध्यमातून आमच्या आयुष्याची नवीन सुरुवात करतोय. हा निर्णय आम्ही आधीच घेतला होता, आता त्याची अंमलबजावणी करण्याची योग्य वेळ आली आहे असं आम्हाला वाटतं, असं दोघांनी म्हटल आहे.

एकमेकांपासून विभक्त होत असलो तरी आम्ही परिवार म्हणून एकच राहणार आहोत. आम्ही दोघेही पहिल्याप्रमाणेच चित्रपट, पाणी फाऊंडेशन आणि इतर प्रोजेक्टवर एकत्रित काम करणार आहोत. आमच्या या निर्णयाला पाठिंबा देणाऱ्या आमच्या मित्र परिवाराचे आम्ही आभार मानतो, कारण त्यांच्या पाठिंब्याशिवाय आम्ही हा निर्णय घेऊ शकलो नसतो, असंही आमिर खान आणि किरण राव यांनी निवेदनात म्हटलं आहे. 

आमिर खान आणि किरण राव यांच्या घटस्फोटाच्या निर्णयानंतर आमिर खानने सर्वांसमोर किरण रावला केलेल्या Kissची चर्चा सध्या सोशल मीडियावर रंगू लागली आहे. २०१८ रोजी आमिर खानने माध्यमांसमोर आपला वाढदिवस साजरा केला होता. यावेळी पत्नी किरण रावसुद्धा होती. यावेळी मोठ्या प्रमाणात मीडिया देखील उपस्थित होती. आमिर खानने केट कट केला. त्यानंतर आमिर आणि किरणने एकमेकांना केक भरवला. केक भरवल्यानंतर आमिरने चक्क सर्वांसमोर किरण रावला किससुद्धा केलं होतं. त्यामुळे सर्वांनाच्याच भुवय्या उंचावल्या होत्या. त्यावेळी देखील आमिर आणि किरणच्या या किसची बरीच चर्चासुद्धा सोशल मीडियावर झाली होती.

दरम्यान २००५ मध्ये आमीर खान आणि किरण रावने लग्न केलं. दोघांचा एक मुलगाही आहे. मुलाचं नाव आहे आझाद. प्रोफेशनल लाइफबाबत सांगायचं तर किरण सिने निर्माती, स्क्रीनरायटर आणि दिग्दर्शक आहे. तिने जाने तू या जाने ना, धोबी घाट, दंगल, तलाश, सीक्रेट सुपरस्टार, पीपली लाइव्हसारख्या सिनेमांची निर्मिती केली आहे. धोबी घाट या सिनेमाचं तिने दिग्दर्शनही केलं आहे. देशभरात दोघेही पाणी फाऊंडेशनसाठी काम करतात.

कशी झाली दोघांची भेट?

एका मुलाखतीत आमीर खानने सांगितले होते की, मी जेव्हा 'लगान' सिनेमा करत होतो तेव्हा किरणसोबत भेट झाली होती. ती असिस्टंट डायरेक्टरपैकी एक होती. पण त्यावेळी आमच्यात काहीच नातं नव्हतं. आमची मैत्रीपण झाली नव्हती. ती यूनिटचा भाग होती.माझ्या घटस्फोटानंतर काही काळाने मी तिला पुन्हा भेटलो. ट्रॉमाच्या त्या फेजमध्ये तिचा फोन आला होता आणि मी तिच्यासोबत अर्धा तास बोललो. जेव्हा मी फोन ठेवला तेव्हा मी म्हणालो 'My God! जेव्हा मी तिच्यासोबत बोलतो तेव्हा मला फार आनंद होतो'. त्यानंतर आम्ही डेटींग सुरू केलं. लग्नाआधी आम्ही दीड वर्षे सोबत होतो.                                                                                                                                  

टॅग्स :आमिर खानकिरण रावबॉलिवूड