5477_article
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2016 14:58 IST
प्रदूषण ही जागतिक स्तरावरील समस्या आहे. हवा, पाणी, जमीन या सर्वच ठिकाणी प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्ये दिवसेंदिवस ही समस्या आणखी बिकट होत चालली आहे. भारताची राजधानी दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सम विषम क्रमांकाची वाहने बाहेर आणण्याचा फॉर्म्युला काढला आहे. जगात अशी अनेक शहरे आहेत, जी या फॉर्म्युल्याशिवाय प्रदूषण कमी करण्यासाठी धडपडत आहेत. त्यांची माहिती देत आहोत...
5477_article
प्रदूषण ही जागतिक स्तरावरील समस्या आहे. हवा, पाणी, जमीन या सर्वच ठिकाणी प्रदूषणामुळे मृत्यूचे प्रमाण वाढले आहे. भारतामध्ये दिवसेंदिवस ही समस्या आणखी बिकट होत चालली आहे. भारताची राजधानी दिल्ली ही जगातील सर्वात प्रदूषित शहरांपैकी एक आहे. त्यामुळे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सम विषम क्रमांकाची वाहने बाहेर आणण्याचा फॉर्म्युला काढला आहे. जगात अशी अनेक शहरे आहेत, जी या फॉर्म्युल्याशिवाय प्रदूषण कमी करण्यासाठी धडपडत आहेत. त्यांची माहिती देत आहोत...मार्च २०११ साली लंडनच्या महापौरांनी पुढाकार घेऊन प्रदूषण कमी करण्यासाठी अगदी छोट्या कालावधीची योजना आखली. या शहरातील १२० बस मार्गावर डिझेलमधून बाहेर पडत असलेले कण फिल्टर करण्याची ही योजना होती. याच्या चाचणीनंतर आलेल्या अहवालानुसार छोट्याशा कालावधीतील योजना यशस्वी झाली आणि शहरातील प्रदूषण हळूहळू कमी होत गेले. चीनमधील बिजींग शहरात प्रदूषणाचे प्रमाण खूपच अधिक आहे. यामुळे बिजींगमधील अधिकाºयांनी व्हेंटिलेशन कॉरीडॉर उभारण्याची सुरुवात केली. २०१३ च्या तुलनेत २०२० पर्यंत हे प्रमाण ४० टक्क्यांनी कमी व्हावे यासाठी प्रयत्न करण्याचे ठरले. ५०० मीच्या परिसरात पाच मोठे कॉरिडॉर उभारण्यात आले. याचा परिणाम खूप चांगल्या पद्धतीने झाला. १९९१ सालापासून नार्वे सरकारने कार्बनडाय आॅक्साईडचा टॅक्स घेण्यास सुरुवात केली. तेल, गॅस क्षेत्र, मालवाहतूक आणि उद्योग क्षेत्रातून कार्बनडाय आॅक्साईड बाहेर पडतो. त्यानंतर त्यांनी उत्सर्जन उद्योगाची उभारणी केली. यात हरितगृहामधून बाहेर पडणाºया गॅस उत्सर्जनावर अधिक लक्ष देण्यात आले. अपारंपरिक ऊर्जा आणि सार्वजनिक वाहतूकीवर अधिक गुंतवणूक केली आहे. सध्या रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर इलेक्ट्रिक कार दिसून येतात. मेक्सिको शहरातील शाळांवर आणि इतर इमारतींवर धुके आणि हवेतील धातुकण शोषून घेण्यासाठी हिरवे छप्पर उभारले आहे. २०१३ साली यासाठी १ दशलक्ष डॉलर्स इतका खर्च केला. शेजारच्या सिंगापूर भागातून येणारे घातक धुके, त्याशिवाय शेजारील जंगलांमधून येणारे धुलीकण यावर मात करण्यासाठी इंडोनेशियाच्या सरकारने संसदेत आंतरविभागीय कायदा तयार केला. करारानुसार जंगलातील आग आणि संदिग्ध कणाबाबत स्थानिक प्रशासनाकडून तत्काळ कारवाई करण्यात येईल. यासाठी स्थानिकांना अधिक अधिकार देण्यात आले आहेत. काही वर्षांपूर्वी ब्राझीलमध्ये जंगलतोड मोठ्या प्रमाणावर होत होती. अनेक सरकारे, अशासकीय संस्था आणि जागतिक नियमानंतर यात काही फरक पडला नाही. मात्र त्यानंतर ब्राझीलने याबाबत काम होऊ शकते हे दाखवून दिले. १९९६ ते २००५ या वर्षात अॅमेझॉनमधील ७० टक्के जंगलतोड थांबली. २०२० पर्यंत शून्यापर्यंत जंगलतोड आणण्याचा या सरकारचा इरादा आहे.