ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २१ : सध्या सैराट फेम आर्चीचा बोलबाला आहे. सगळीकडे आर्ची अर्थात रिंकू राजगुरुचीच जादू पाहायला मिळतेय. विविध कार्यक्रमांमध्येही फक्त आर्ची आणि आर्चीच पाहायला मिळतेय. त्यामुळं मराठीतल्या इतर नायिकांची जादू कमी झाली की अशी परिस्थिती निर्माण झालीय. एरव्ही प्रत्येक कार्यक्रमात झळकणा-या आणि सिनेमांमध्ये झळकणा-या नायिकांचं धाबं दणाणलंय.
एकेकाळी सई ताम्हणकर मराठी चित्रपटसृष्टीत वर्चस्व गाजवत होती आणि रसिकांची फेव्हरेट होती. मात्र आगामी एका सिनेमात सई नायिकेच्या भूमिकेत नाही तर आत्याच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळं आर्चीमुळे सईची जादू ओसरल्याचा हा परिणाम तर नाही ना अशा चर्चा सध्या रंगू लागल्यात.