Migration of Indian Millionaires: गेल्या काही काळापासून भारतातील हजारो कोट्यधीश देश सोडून इतरत्र स्थायिक होत आहेत. हेन्ले प्रायव्हेट वेल्थ मायग्रेशन रिपोर्ट २०२५ नुसार, २०२५ मध्ये कोट्यधीशांनी देश सोडून जाण्याचा वेग मंदावेल. या वर्षी सुमारे ३५०० करोडपती देश सोडून परदेशात स्थायिक होतील. तर, दोन वर्षांपूर्वी(२०२३) देश सोडून परदेशात स्थायिक होणाऱ्यांची संख्या ४३०० होती.
या अहवालानुसार, देश सोडून जाणाऱ्या श्रीमंतांची एकण संपत्ती $२६.२ अब्जच्या जवळपास असेल. दरम्यान, २०१४ ते २०२४ पर्यंत भारतातील करोडपतींच्या संख्येत ७२ टक्क्यांनी वाढही झाली आहे.
हजारो श्रीमंत लोक देश सोडून जाताहेतग्लोबल इन्व्हेस्टमेंट मायग्रेशन कन्सल्टन्सी कंपनी हेन्ले अँड पार्टनर्सने प्रकाशित केलेला हा अहवाल १ दशलक्ष अमेरिकन डॉलर्स किंवा त्याहून अधिक गुंतवणूक करण्यायोग्य मालमत्ता असलेल्या व्यक्तींच्या अलिकडच्या वर्ष-दर-वर्ष हालचालींचा मागोवा घेतो.
सर्वाधिक श्रीमंत लोक(सुमारे १६,५००) युनायटेड किंग्डम सोडणार आहेत. तर, सूमारे ७,८०० श्रीमंत लोक चीन सोडतील. या दोन देशांशिवाय, फ्रान्समधून ८०० करोडपती, स्पेनमधून ५०० आणि जर्मनीमधून सुमारे ४०० इतरत्र स्थायिक होऊ शकतात. यातील बरेच लोक मोनाको, माल्टा किंवा दुबईसारख्या कर अनुकूल देशांमध्ये स्थलांतरित होत आहेत.
युएई, अमेरिका आणि सौदी बनले पर्याययुएई सर्वाधिक करोडपतींना आकर्षित करत आहे. असा अंदाज आहे की, या वर्षी सुमारे ९,८०० लोक येथे स्थायिक होऊ शकतात. युएईनंतर, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे, जिथे या वर्षी ७,५०० करोडपती स्थायिक होऊ शकतात. कर धोरणे, जीवनशैली आणि गोल्डन व्हिसा पर्यायांमुळे, युएई हा युके, भारत, रशिया, आग्नेय आशिया आणि आफ्रिकेतील लोकांसाठी पहिली पसंती राहिला आहे. सौदी अरेबिया देखील श्रीमंतांसाठी एक केंद्र म्हणून उदयास येत आहे, जिथे एका अंदाजानुसार, २०२५ मध्ये २४०० करोडपती येणार आहेत.