राज्यात उष्णतेने अंगाची लाही लाही होत आहे. आज (दि २९) रोजी सोलापूर शहरात सर्वाधिक तापमानाची हवमान विभगााने नोंद केली. यावेळी ४३.७ अंश तापमान नोंदवले गेले. हवमान विभागाने जाहीर केलेल्या विशेष हवमान बुलेटीनमध्ये नोंदवल्या गेलेल्या अहवालानुसार आज मध्य महाराष्ट्र, उत्तर कोकण भागात सामान्य तापमानाच्या तूलनेत अधिक तापमानाची नोंद झाली.
उत्तर कोकणात आज उष्णतेच्या लाटेचा अंदाज देण्यात आला होता. यावेळी कमाल तापमान ३४ ते ३८ अंशांपर्यंत गेले होते. ठाण्यात ४०.८ अंश तापमानाची नोंद झाली.
मराठवाड्यात तापमानाचा पारा चढाच असून परभणी ४२.८ अंश तर नांदेड ४२.४ अंश तापमानाची नोंद झाली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात आज ४०.७ अंश तापमानाची नोंद करण्यात आली असून धाराशिव, लातूर जिल्ह्यात ४०.४ अंश तापमान नोंदवले गेले.
राज्यात पुढील पाच दिवस तापमानात होणार वाढ, काय दिला हवमान विभागाने अंदाज
विदर्भात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली असली तरी तापमान टोक गाठत आह. वाशिम, चंद्रपूर जिल्ह्यात ४१.८ अंश तर यवतमाळ ४१.५ तर जळगावात ४२.२ अंश तापमानाची नोंद झाली. पुण्यात आज ४१.३ अंश तापमानाची नोंद करण्यात आली असून सातारा सांगलीही चाळीसपार गेले आहेत. नाशिक जिल्ह्यात ४१.२ अंश सेल्सियस तापमानाची नोंद करण्यात आली आहे.