श्रीनिवास भोसले
छत्रपती संभाजीनगर विभागातील ४४ मोठे, मध्यम आणि लघू प्रकल्पांत सध्या एकूण ४१.७२ टक्के उपयुक्त जलसाठा उपलब्ध असून, हा साठा वर्षीच्या १५.०९ टक्क्यांच्या तुलनेत तब्बल २५ टक्क्यांनी अधिक आहे.(Marathawada Water Issue)
यंदा मराठवाड्याला दिलासा मिळाला असून, बहुतांश गावांची तहान भागत आहे. मात्र, नियोजनअभावी शेकडो गावांना टँकरचा आधार अन् डोक्यावर हंडा घ्यावा लागत आहे.(Marathawada Water Issue)
जायकवाडी प्रकल्पात ४३.७१ टक्के, आपेगाव बंधारा ४७.५७ टक्के, तर बीडमधील मांजरा प्रकल्पात ४२.७१ टक्के जलसाठा आहे. हिंगोलीतील सिद्धेश्वर धरण ४२.३२ टक्के आणि येलदरी धरणात ५७.१८ टक्के साठा असून, नांदेडच्या विष्णुपुरी प्रकल्पात ३१.८७ टक्के पाणी उपलब्ध आहे. धाराशिव जिल्ह्यात निम्न तेरणा प्रकल्पात सर्वाधिक ५५.४९ टक्के जलसाठा असून, लातूर जिल्ह्यात नागझरी बंधाऱ्यात सर्वाधिक ६१.४९ टक्के पाणी उपलब्ध आहे.
या जलसाठ्यामुळे मराठवाड्यातील बहुतांश भागांना पाणीपुरवठा सुरळीत झाला आहे. मात्र, काही गावांमध्ये प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे व नियोजनाअभावी पाणीटंचाई जाणवत आहे. नांदेड जिल्ह्यात आजघडीला १४ टँकर सुरू झाले असून, मराठवाड्यातील इतर जिल्ह्यात नांदेडपेक्षा अधिक टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.
छोट्या-मोठ्या प्रकल्पांतील जलसाठा (आकडे टक्केवारीत)
छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील
आपेगाव | ४७.५७ |
बीड जिल्ह्यातील
डोंगरगाव | ३८.०२ |
माजलगाव | १८.८५, |
मांजरा | ३३.२०, |
रोशनपुरी बंधारा | ६.५१, |
वांगदरी बंधारा | ३३.३३, |
नांदेड जिल्ह्यातील आमदुरा
ढालेगाव | ३०.९६, |
दिगडी | ४३.९७, |
दिग्रस | १९.९५, |
हिरडपुरी | १०.५३, |
जोगलादेवी | २३.४०, |
लोणीसावंगी | १३.१४, |
निम्न मानार | ४६.९०, |
मंगरूळ | ११.६०, |
मुदगल बंधारा | ५६.०७ |
धाराशिव जिल्ह्यात नऊ प्रकल्प असून,
औराद बंधारा | ३१.६१ |
गुंजारगा | ८.७६, |
किल्लारी | २७.६९, |
लिंबाळा | ६.९०, |
मदनसुरी | ५.१७, |
राजेगाव | ५.०८, |
सिना कोळेगाव | ३.६०, |
लातूर जिल्ह्यातील ९ प्रकल्पांपैकी नागझरी बंधाऱ्यात सर्वाधिक ६१.४९ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.
तसेच भुसानी | ३८.२६, |
बिंडगिहाळ बंधाऱ्यात | २.२२, |
कारसा पोहरेगाव | ४९.२७, |
फुलगापूर | २२.१२, |
साई | ३२.८५, |
शिवण | २०.७८, |
टाकळगाव देवरा | ७.१०, |
वांझरखेडा बंधारा | ४६.३९, |
तर निम्न दुधनामध्ये ३६.७१ टक्के उपयुक्त पाणीसाठा आहे.