Join us

Marathwada Water Storage Update : मराठवाड्यात जलसमृद्धी; जायकवाडी ओसंडली, बंधारे वाहू लागले

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 09:20 IST

Marathwada Water Storage Update : तीन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मराठवाडा जलसंपन्न झाला आहे. यंदा झालेल्या मुबलक पावसामुळे मराठवाड्यातील मोठे, मध्यम आणि लघु असे सर्व धरणे शंभर टक्के भरली आहेत. गोदावरी खोऱ्यातील १३ बंधारे ओसंडत असून जायकवाडी धरणातून नदीपात्रात पाणी सोडले जात आहे. शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी ही आनंदवार्ता ठरली आहे.

Marathwada Water Storage Update : दीर्घकाळ दुष्काळ, पाण्याची टंचाई, आणि टँकरवाडा अशी ओळख बनलेला मराठवाडा यंदा जलसमृद्धीने ओतप्रोत झाला आहे. (Marathwada Water Storage Update)

मागील तीन वर्षांनंतर प्रथमच संपूर्ण मराठवाड्यातील मोठे, मध्यम आणि लघु प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून जलसंपदा विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार सर्व प्रकल्पांत सरासरी ९३ टक्क्यांहून अधिक जलसाठा आहे. (Marathwada Water Storage Update)

सन २०२३ आणि २०२४ या दोन वर्षांत मराठवाड्यातील मध्यम व लघु प्रकल्पांत फक्त ३१ टक्क्यांच्या आसपास जलसाठा होता. मात्र, यंदा पावसाने दिलेल्या जबरदस्त उपस्थितीमुळे हा आकडा तिपटीने वाढून ९३ टक्क्यांवर पोहोचला आहे. ही वाढ केवळ आकडेवारी नाही, तर मराठवाड्याच्या शेतकऱ्यांसाठी आणि नागरिकांसाठी नव्या आशेचा किरण ठरली आहे. (Marathwada Water Storage Update)

यंदाच्या पावसाने भरले सर्व प्रकल्प

गोदावरी खोऱ्यातील तब्बल १३ बंधारे सध्या ओसंडून वाहत आहेत. मुख्य जलस्रोत असलेला जायकवाडी धरण प्रकल्प १०० टक्के भरल्याने पाणी नदीपात्रात सोडण्याची वेळ आली आहे.

जलसंपदा विभागाच्या माहितीनुसार, मराठवाड्यातील ११ मोठे प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत, तर मध्यम आणि लघु प्रकल्पांची स्थितीही अत्यंत समाधानकारक आहे.

प्रकल्पनिहाय जलसाठ्याची स्थिती

प्रकल्पाचा प्रकारआजचा साठा (%)
मोठे प्रकल्प98%
मध्यम प्रकल्प93%
लघु प्रकल्प93%
उच्च पातळी बंधारे92.26%

तीनपट वाढलेला जलसाठा

जलसंपदा विभागाच्या आकडेवारीनुसार, यंदा मराठवाड्यातील ७५ मध्यम प्रकल्प आणि ७५४ लघु प्रकल्पांमध्ये सरासरी ९३ टक्के जलसाठा आहे. मागील दोन वर्षांच्या तुलनेत हा जलसाठा तीन पटीने वाढला आहे. यामुळे केवळ पिण्याच्या पाण्याची समस्या दूर होणार नाही, तर रब्बी हंगामासाठी सिंचनाची मुबलक उपलब्धता राहणार आहे.

शेतकऱ्यांसाठी आनंदवार्ता

या जलसाठ्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांसाठी मुबलक पाण्याची सोय होईल. दीर्घकाळ दुष्काळाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना यंदा दिलासा मिळणार आहे.

मराठवाड्यात जलसमृध्दीचा नवा अध्याय

दीर्घकाळ टँकरवर अवलंबून असलेले गाव आता स्वतःच्या प्रकल्पांतील पाण्यावर जगतील. अनेक धरणे, बंधारे आणि तलाव ओसंडून वाहत असल्याने भूजल पातळीही वाढण्याची शक्यता आहे. 

मराठवाड्यात यंदा पावसाने केवळ पिकांना नवसंजीवनीच दिली नाही, तर जलसंपन्नतेचा नवा इतिहास रचला आहे.

हे ही वाचा सविस्तर : Dam Water Level Maharashtra : सप्टेंबरच्या पावसाने लघु प्रकल्प तुडुंब; रब्बी हंगामाला येणार गती वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Marathwada Dams Full After Three Years, Ending Water Scarcity

Web Summary : For the first time in three years, Marathwada's dams are full, with 93% water storage in medium and minor projects. Godavari River's 13 dams overflow. All 11 major projects are 100% full, ending the region's drought woes.
टॅग्स :शेती क्षेत्रधरणमराठवाडाजायकवाडी धरणपाणी