Marathawada Dam Water : अवकाळी पावसाने पीक, फळबागांचे अतोनात नुकसान केले असले तरी ऐन उन्हाळ्यात मराठवाड्यातील प्रकल्पांतील जलसाठांत समाधानकारक वाढ झाली आहे. (Marathawada Dam Water)
'मे'न्सूनने बल्ले बल्ले केल्यामुळे मोठ्या प्रकल्पांत २७% जलसाठा झाला असून, बीडचा बिंदुसरा प्रकल्प ओसंडून वाहत आहे. सिद्धेश्वर ५०% भरले. मागीलवर्षीच्या तुलनेत मे महिन्यातच जवळपास सर्व जलसाठ्यांत दुप्पट वाढ झाली आहे. जायकवाडीत सध्या ३० टक्के जलसाठा आहे. (Marathawada Dam Water)
मे महिन्यात मराठवाड्यात पावसाने हजेरी लावत उन्हाच्या झळांमधून दिलासा दिला आहे. अवकाळी पावसाने शेतमालाचे अतोनात नुकसान झाले असले तरी, जलसाठ्यांमध्ये झालेली वाढ ही या हंगामातील सकारात्मक बाब ठरली आहे. (Marathawada Dam Water)
सध्या संपूर्ण मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये २७ ते ३० टक्के, तर मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये १२ ते २५ टक्के जलसाठा शिल्लक आहे.
प्रमुख प्रकल्पांची सद्यस्थिती
जायकवाडी धरण (छत्रपती संभाजीनगर)
सध्या साठा : ३०%
पावसामुळे पाणी पातळीत समाधानकारक वाढ झाली आहे.
सिद्धेश्वर धरण (हिंगोली)
सध्या जलसाठा : २३.६२% (११ दलघमी जिवंत साठा)
मागील वर्षीच्या तुलनेत दुप्पट साठा उपलब्ध आहे
२०२४ मध्ये मेअखेर केवळ ०% जलसाठा होता
इसापूर धरण (कळमनुरी, हिंगोली)
सध्या जलसाठा : ४३%
या पाण्यावर यवतमाळ व नांदेडच्या काही गावांचा पाण्याचा स्रोत
बीड जिल्हा
बिंदुसरा प्रकल्पासह ९ प्रकल्प ओव्हरफ्लो
२२८ मिमी पावसाची नोंद, वार्षिक सरासरीच्या ३०% इतका पाऊस मे मध्येच
१४३ प्रकल्पांमध्ये पाणीपातळी वाढ
जालना जिल्हा
भोकरदन व जाफराबाद तालुक्यातील लघु प्रकल्पांत १ ते ५% वाढ
उन्हामुळे घटलेली पातळी मे मध्ये झालेल्या पावसाने सुधारली
परभणी जिल्हा
येलदरी प्रकल्प : ५०.३७% जलसाठा उपलब्ध आहे
निम्न दुधना प्रकल्प : ३६.८%
मागील वर्षीच्या तुलनेत पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे
धाराशिव जिल्हा
सीना कोळेगाव प्रकल्पात ८.३३% साठा
मांजरा, तेरणा प्रकल्प : १८.६७%
सर्व प्रकल्पांत सरासरी १८.०८% वाढ
नांदेड जिल्हा
विष्णुपुरी प्रकल्प : २०.०५% साठा (जुलैपर्यंत पुरेल)
निम्न मानार प्रकल्प (बारूळ) : ४२.१८%
ऊर्ध्व मानार (लिंबोटी) : २१.६१%
दिग्रस बंधारा : १८.८०%
मे महिन्यात पावसाने दिलेल्या दिलासामुळे मराठवाड्याच्या पाणीसाठ्यांमध्ये लक्षणीय वाढ झाली आहे. उन्हाळा जरी कडक असला तरी जलप्रकल्पांची स्थिती पाहता पाणीसंकट आटोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आता नजर लागली आहे. खरीप पावसाळ्यावर तो वेळेवर आणि समाधानकारक झाला, तर मराठवाड्याला यंदा दिलासा मिळेल.