Maharashtra Weather Update : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या विविध भागांत धुमाकूळ घालणाऱ्या अवकाळी पावसाने आता विश्रांती घेतली आहे. मात्र, पावसाचे संकट ओसरताच महाराष्ट्रावर आता उष्णतेच्या लाटेचे सावट निर्माण झाले आहे.(Maharashtra Weather Update)
IMD ने दिलेल्या माहितीनुसार, एप्रिल महिन्यातच राज्याचा पारा ४० अंशांच्या पार जाण्याची शक्यता असून अनेक जिल्ह्यांना 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे.(Maharashtra Weather Update)
उकाडा वाढणार
सततचा पाऊस, गारपीट आणि ढगाळ वातावरणामुळे त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांसाठी हवामान विभागाने सुखद बातमी दिली आहे.
२० एप्रिलपर्यंत राज्यात पावसाची कोणतीही शक्यता नसून आकाश पूर्णपणे निरभ्र राहणार आहे. मात्र, पाऊस थांबताच सूर्याने आग ओकायला सुरुवात केली आहे.
विदर्भ, मराठवाडा आणि जळगाव 'हॉटस्पॉट'
सध्या राज्याचे सरासरी तापमान ३२ ते ३५ अंश सेल्सिअसच्या दरम्यान आहे. परंतु, पुढील काही दिवसांत तापमानात ५ ते ६ अंशांची वाढ होण्याचा अंदाज आहे.
विदर्भ आणि मराठवाडा: या भागात पुढील तीन आठवडे तापमानाचा पारा उच्चांकी राहण्याची शक्यता आहे.
जळगाव आणि खान्देश: येथे पारा थेट ४० अंशांच्या पुढे जाण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी दुपारच्या वेळी बाहेर पडणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
मध्य महाराष्ट्र: सातारा वगळता सर्वत्र कोरडे हवामान
मध्य महाराष्ट्रातील अवकाळीचा धोका आता पूर्णपणे टळला आहे. केवळ सातारा जिल्ह्यात ढगाळ वातावरणासह हलक्या सरींची शक्यता आहे, तर घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी पाऊस पडू शकतो. उर्वरित भागात उष्ण लहरींचा प्रभाव वाढणार आहे.
कोकण किनारपट्टीला 'यलो अलर्ट'
मुंबईसह संपूर्ण कोकण विभागासाठी हवामान विभागाने उष्ण आणि दमट हवामानाचा इशारा दिला आहे.
मुंबईत तापमान ३६ अंशांपर्यंत पोहोचण्याचा अंदाज आहे.
आर्द्रता कमी झाल्यामुळे घामाचे प्रमाण वाढून उकाडा अधिकच असह्य होईल.
कोकणातील सहा जिल्ह्यांमध्ये पुढील २४ तास हवामान कोरडे राहील.
शेजारील राज्यांचा परिणाम
गुजरातमध्ये पारा ३८ अंशांवर तर तेलंगणा आणि रायलसीमा भागात ४१ अंशांच्या पुढे गेला आहे. याचा थेट परिणाम महाराष्ट्राच्या सीमावर्ती जिल्ह्यांवर (सोलापूर, सांगली, लातूर) होणार असून, येथे उष्णतेची लाट अधिक तीव्र असेल.
हवामान विभागाचा आरोग्यासाठी सल्ला
* पुरेसे पाणी प्या: शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होऊ देऊ नका.
* वेळेचे नियोजन: दुपारी १२ ते ४ या वेळेत कामे टाळा.
* पोशाख: उन्हात बाहेर पडताना सुती आणि हलके कपडे वापरा.
* आहार: ताक, लिंबू सरबत आणि फळांचा आहारात समावेश करा.
शेतकऱ्यांना सल्ला
* उन्हाचा तडाखा ४० अंशांच्या वर जाण्याची शक्यता असल्याने, शेतीची कामे शक्यतो सकाळी १० वाजेपर्यंत आणि संध्याकाळी ५ नंतर करावीत, असा सल्ला देण्यात आला आहे.
Web Summary : Maharashtra faces a heatwave as temperatures soar past 40°C in several districts. IMD issues a yellow alert, particularly for Vidarbha, Marathwada, and Jalgaon. Citizens advised to stay hydrated and avoid midday sun. Relief expected after April 20th.
Web Summary : महाराष्ट्र में भीषण गर्मी की लहर का प्रकोप, कई जिलों में तापमान 40 डिग्री सेल्सियस से ऊपर। आईएमडी ने विदर्भ, मराठवाड़ा और जलगाँव के लिए येलो अलर्ट जारी किया। नागरिकों को हाइड्रेटेड रहने और दोपहर में धूप से बचने की सलाह दी जाती है। 20 अप्रैल के बाद राहत मिलने की उम्मीद है।