Maharashtra Dam : काही दिवसांपासून राज्यातील बहुतांश भागात पावसाची संततधार सुरूच आहे. त्यामुळे अनेक धरणातील पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. राज्यातील प्रमुख धरणांमध्ये आजपर्यंत किती पाणीसाठा झाला आहे ते पाहूयात.
मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचा (Jayakwadi Dam) विचार केला तर ५३.९३ टक्के एकूण जलसाठा आहे. तर उजनी धरणात एकूण ८६.४८ टक्के जलसाठा असून उपयुक्त जलसाठा हा ७०.४३ टक्के आहे. कोयना धरणात एकूण जलसाठा ४०.३५ टक्के तर ३७.२९ टक्के उपयुक्त जलसाठा आहे.
तसेच नाशिक विभागातील महत्त्वाच्या असलेल्या गंगापूर धरणात (Gangapur Dam) ५९.७२ टक्के, दारणा धरणात ५६.८३ टक्के तर गिरणा धरणात २७.५४ टक्के, हतनुर धरणात ४७.८४ टक्के जलसाठा जमा झाला आहे.
तर मुंबई विभागातील धरणांची स्थिती पाहिली असता मोडक सागर धरणात ५१.३४ टक्के, तानसा धरणात ३७.३४ टक्के तर भातसा धरणात ४५.५५ टक्के जलसाठा आहे. पुणे विभागातील चासकमान धरणात ३७.२० टक्के, पानशेत धरणात ३८.१२ टक्के, खडकवासला धरणात ६०.८७ टक्के, मुळशी धरणात ४५.२४ टक्के तर वीर धरणात ७८. १ टक्के जलसाठा जमा झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा धरणात ४६.५५ टक्के, निळवंडे धरणात ४१.३६ टक्के, सीना धरण १०० टक्के भरले असून विसापूर धरणास ८८.७१ जलसाठा जमा झाला आहे.
कोणत्या धरणातून किती विसर्ग?
तर सर्वाधिक विसर्ग हा राजापूर बंधाऱ्यातून ७३ हजार ४२ क्युसेकने होत आहे. त्यानंतर उजनी धरणातून ५१ हजार ६०० क्युसेक, दौंड धरणातून २६ हजार ८७४ क्युसेक, वीर धरणातून २७ हजार ७९६ क्युसेक, त्यानंतर खडकवासला धरणातून ०३ हजार ७६२ क्युसेक, तर गंगापूर धरणातून १७६० क्युसेक, नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीत १२ हजार ५२० क्युसेकने विसर्ग सुरू आहे.
- श्री. हरिश्चंद्र चकोर (से.नि. अधिकारी, जलसपंदा विभाग) संगमनेर