Join us

Lower Dudhana Dam : खरिपासाठी शुभवार्ता : दुधना प्रकल्पात ऐतिहासिक पाणीवाढ! वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2025 15:06 IST

Lower Dudhana Dam : जालना जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पात पावसाच्या आधीच जलसाठ्यात तब्बल ८ टक्के वाढ झाली आहे. मे महिन्यातील अवकाळी सरींमुळे जून उजाडताच प्रकल्पात ३६ टक्के जिवंत साठा शिल्लक आहे. प्रकल्पाच्या इतिहासात प्रथमच घडत असून, आगामी खरीप हंगामासाठी ही चांगली नांदी मानली जात आहे. (Lower Dudhana Dam)

Lower Dudhana Dam : दुधना प्रकल्पात एकाच महिन्यात तब्बल ८ टक्के पाणीसाठ्याची वाढ झाली असून, सध्या ३६ टक्के जिवंत साठा शिल्लक आहे. हे दृश्य नेहमीपेक्षा वेगळं आहे कारण यापूर्वी पावसाची प्रतिक्षा जुलैपर्यंत करावी लागायची. (Lower Dudhana Dam)

जालना जिल्ह्यातील निम्न दुधना प्रकल्पात पावसाच्या आधीच जलसाठ्यात तब्बल ८ टक्के वाढ झाली आहे. मे महिन्यातील अवकाळी सरींमुळे जून उजाडताच प्रकल्पात ३६ टक्के जिवंत साठा शिल्लक आहे.  (Lower Dudhana Dam)

प्रकल्पाच्या इतिहासात प्रथमच घडत असून, आगामी खरीप हंगामासाठी ही चांगली नांदी मानली जात आहे. हा पाणीसाठा शेती आणि शहरांना दिलासा देणारा ठरणार आहे. या जलसाठ्यामुळे परिसरातील पाणीपुरवठा आणि शेतकऱ्यांच्या खरीप हंगामासाठीची तयारी सुकर होणार आहे. (Lower Dudhana Dam)

मे महिन्याच्या अवकाळी पावसाचे मोठे फलित

जालना जिल्ह्यात यंदाच्या मे महिन्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्यानंतर निम्न दुधना प्रकल्पात लक्षणीय पाण्याची आवक झाली आहे. पारंपरिक पावसाळ्यापूर्वीच प्रकल्पात जलसाठ्यात ८ टक्क्यांनी वाढ झाली असून, सध्या प्रकल्पात सुमारे ३६ टक्के जिवंत पाणीसाठा शिल्लक आहे. यामुळे आगामी खरीप, रब्बी हंगामासाठी आशेचा किरण निर्माण झाला आहे.

मे महिन्यातच पाणीसाठा वाढीला

निम्न दुधना प्रकल्पात दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये पाण्याची मुख्य आवक होते. मात्र, यंदा मे महिन्यातच झालेल्या जोरदार पावसामुळे परिस्थितीत मोठा बदल झाला. २३ ते ३१ मे या कालावधीत तब्बल १९ दलघमी (दशलक्ष घनमीटर) पाण्याची आवक झाली. यामध्ये २३ मे रोजी २ दलघमी, २४ मे रोजी ५.७० दलघमी, २८ रोजी ६.३८, २९ रोजी ३.३०, तर ३१ रोजी १.२० दलघमी इतकी नोंद झाली.

जूनमध्येही पावसाची रिपरिप सुरु

मे महिन्यापाठोपाठ जूनमध्येही जिल्ह्यात अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत असल्याने प्रकल्पात पाण्याची आवक सुरूच आहे. परिणामी, आधीच ३६ टक्क्यांपर्यंत पोहोचलेला जलसाठा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

या जलसाठ्यावरून सेलू, मंठा, परतूर शहरांना पाणीपुरवठा केला जातो, तसेच कालव्याद्वारे शेतकऱ्यांच्या पिकांसाठीही वापर होतो.

शेतकऱ्यांना दिलासा

प्रकल्पात पूर्ण क्षमतेऐवजी केवळ ७५ टक्केच जलसाठा ठेवण्याचे धोरण राबवले जाते. उर्वरित पाणी नदीपात्रात सोडले जाते, जेणेकरून बुडीत क्षेत्रातील पिकांचे नुकसान टाळता येते. 

मागील हंगामातही नोव्हेंबर ते फेब्रुवारीदरम्यान २१ दिवसांच्या अंतराने तीन आवर्तनांमध्ये रब्बी हंगामातील गहू, हरभरा यांसारख्या पिकांना पाणी देण्यात आले.

मे महिन्यात अशी पहिलीच नोंद

दुधना प्रकल्पाच्या इतिहासात प्रथमच मे महिन्यात इतकी ठोस पाण्याची आवक झाल्याची नोंद आहे. जुलै महिन्याच्या पूर्वीच पावसाच्या जोरदार हजेरीमुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळण्यास सुरुवात झाली आहे. 

सध्याची जलपातळी पाहता, यंदाचा खरीप हंगाम सुरळीत होण्याची शक्यता असल्याचे जलसंपदा विभागातील अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

हे ही वाचा सविस्तर : Lower Dudhana Project : दुधनेच्या पाण्याचा हरभरा, गहू, ज्वारी पिकांना बुस्टर!

टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाणीजालनाशेतकरीशेती