Join us

आज 16 ऑगस्टपर्यंत 'ही' धरणे 100 टक्के भरली, इतर धरणांत किती पाणी, वाचा सविस्तर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 14:26 IST

Maharashtra Dam : आज १६ ऑगस्टपर्यंत राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे हे पाहुयात....

Maharashtra Dam : गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा हजेरी लावण्यास सुरुवात केली आहे. यामुळे धरणांमध्ये काहीशी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आज १६ ऑगस्टपर्यंत राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा जमा झाला आहे हे पाहुयात....

आज १६ ऑगस्टपर्यंत राज्यातील आढळा, सीना, पांझरा, उजनी, राधानगरी धरण १०० टक्के भरली आहेत. तर बहुतांश धरणे ९० टक्क्यांच्यावर भरली आहेत. 

आता विभागनिहाय धरणसाठा पाहिला तर नाशिक विभागातील गंगापूर धरण (Gangapur Dam) ८३.४३ टक्के, दारणा धरण (Jayakwadi Dam) ८२.८२ टक्के, करंजवण धरण ९१.०८ टक्के, गिरणा धरण ६६.८५ टक्के, हतनूर धरण ४२.२७ टक्के, ऊकई धरण ६८.१९ टक्के, भंडारदरा धरण ८९.४५ टक्के तर निळवंडे धरण ८६.४३ टक्क्यांवर आहे. 

तसेच मुंबई, कोकण विभागातील धरणांपैकी मोडक सागर धरण ८८.४९ टक्के, तानसा धरण ९८.०८ टक्के, विहार धरण ८७.०० टक्के, भातसा धरण ९१.३६ टक्के, हेटवणे धरण ८९.६९ टक्के, चासकमान धरण ९६८.४० टक्के, पानशेत धरण ८९.८४ टक्के, खडकवासला धरण ५०.६४ टक्के, मुळशी धरण ८३.३४ टक्के भरले आहे. 

तसेच मराठवाडा आणि नागपूर विभागातील धरणांपैकी उजनी धरण एकूण १०१.४१ टक्के, कोयना धरण ८५.४४ टक्के, अलमट्टी धरण ९९.४३ टक्के, जायकवाडी धरण ९४.७० टक्के, मांजरा धरण ८२.८७ टक्के, सिद्धेश्वर धरण ८६.६० टक्के, गोसेखुर्द धरण ४३.०३ टक्के, तोतला डोह, ६५.६० टक्के, खडकपूर्ण ८६.५६ टक्के, काटेपूर्णा ६६.५१ टक्के, उर्ध्ववर्धा ६२.४७ टक्के भरले आहे. 

- इंजि. हरिश्चंद्र र. चकोर, जलसंपदा (से.नि) संगमनेर.)

टॅग्स :जायकवाडी धरणशेती क्षेत्रहवामान अंदाजधरणगंगापूर धरणउजनी धरण