Maharashtra Dam : गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्याने धरणांमधूनचा (Maharashtra Dam Water Level) विसर्ग बंद करण्यात आला आहे, तर काही धरणांमधून विसर्ग सुरू आहे. आज ०५ ऑगस्टपर्यंत राज्यातील धरणांमध्ये किती पाणीसाठा आहे हे सविस्तर पाहूयात..
आज ०५ ऑगस्टपर्यंत राज्यातील चार मोठी धरणे १०० टक्के भरली असून यामध्ये मोडकसागर, सीना, आढळा, पांझरा या धरणांचा समावेश आहे. तर जवळपास १३ धरणे ९० टक्क्यांच्यावर भरली आहेत.
काही निवडक धरणांचा पाणीसाठा पाहुयात..
यामध्ये भंडारदरा धरण ८७.९० टक्के, निळवंडे धरण ९०.८३ टक्के, मुळा धरण ९०.११ टक्के, भोजापुर धरण ९३.३५ टक्के, डिंभे धरण ८८.१४ टक्के, गंगापूर धरण ८२.०६ टक्के, दारणा धरण ८६.७५ टक्के, कडवा धरण ९०.३४ टक्के, गिरणा धरण ६६.११ टक्के, हातनुर धरण २९.२५ टक्के, अक्कलपाडा धरण ८३.३२ टक्के, तानसा धरण ९८.६१ टक्के, मध्य वैतरणा धरण ९५.८५ टक्के, भातसा धरण ८९.६१ टक्के, तिलारी धरण ७९.७९ टक्के भरले आहे.
तसेच चासकमान धरण ९६.०६ टक्के, पानशेत धरण ८९.५४ टक्के, खडकवासला धरण ६६.२० टक्के, मुळशी धरण ८६.४४ टक्के, उजनी धरणात एकूण ९८.९८ टक्के जलसाठा असून उपयुक्त जलसाठा ९७.७९ टक्के आहे. कोयना धरणात उपयुक्त जलसाठा ८२.२१ टक्के भरले आहे.
राधानगरी धरण ९८.२९ टक्के,अलमट्टी धरण ९१.१६ टक्के, जायकवाडी धरणात एकूण ९३.७५ टक्के जलसाठा असून उपयुक्त जलसाठा ९१.६२ टक्के, माजलगाव धरण २२.१८ टक्के, मांजरा धरण ३१.४५ टक्के, गोसेखुर्द धरण ४२.४० टक्के, खडकपूर्णा धरण ६७.९८ टक्के असा जलसाठा आहे.
काही निवडक धरणांमधून असा विसर्ग राजापूर बंधारा ३५ हजार क्युसेक, अलमट्टी धरण ९ हजार ९९४ क्युसेक, उजनी धरणातून १६०० क्युसेक, गोसीखुर्द धरण ११ हजार ५४८ क्युसेकने विसर्ग सुरु आहे.