Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dam Water Storage : उन्हाचा तडाखा वाढणार... तरीही यंदा शेतीला पाण्याची हमी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2026 16:31 IST

Dam Water Storage : मार्चपासून तापमान वाढणार असताना यवतमाळ जिल्ह्यातील धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा असल्याने शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यंदा उन्हाळ्यातही शेतीला पाणी मिळणार का? जाणून घ्या सविस्तर परिस्थिती.(Dam Water Storage)

Dam Water Storage : मार्च महिन्यात उन्हाची दाहकता वाढण्याचे संकेत मिळत असताना यवतमाळ जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे.(Dam Water Storage)

पाटबंधारे विभागाच्या मोठे, मध्यम आणि लघु अशा एकूण ७४ प्रकल्पांमध्ये सध्या ६३.६२ टक्के जलसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे संभाव्य उन्हाळी टंचाई लक्षात घेऊन प्रशासनाने तयारी सुरू केली असून शेतीसाठीपाणी उपलब्ध राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.(Dam Water Storage)

मोठ्या प्रकल्पांतील जलसाठा

जिल्ह्यातील तीन प्रमुख मोठ्या प्रकल्पांमध्ये समाधानकारक पाणीसाठा आहे.

पूस प्रकल्प (पुसद) – ६१.५६%

अरुणावती प्रकल्प (दिग्रस) – ६९.३३%

बेंबळा प्रकल्प (बाभूळगाव) – ५१.३१%

यामुळे सिंचनासाठी पाण्याचा काही प्रमाणात आधार मिळणार आहे.

मध्यम प्रकल्पांची स्थिती

जिल्ह्यातील सात मध्यम प्रकल्पांमध्येही पाणीसाठा चांगल्या प्रमाणात आहे.

गोकी (दारव्हा) – ७१.१८%

वाघाडी (घाटंजी) – ७०.७९%

सायखेडा (केळापूर) – ६७.५१%

अधरपूस (महागाव) – ८१.६२%

बोरगाव (यवतमाळ) – ५२.३४%

कारंजा – ६७.९१%

नवरगाव (मारेगाव) – ६०.१०%

लघु प्रकल्पांची स्थिती अधिक समाधानकारक

जिल्ह्यातील ६४ लघु प्रकल्पांमध्ये सध्या

१४६.८२ दलघमी पाणीसाठा

६१.७७% भराव

गतवर्षी याच कालावधीत हा साठा फक्त ४०.७२% होता. म्हणजेच यावर्षी २१% अधिक पाणीसाठा उपलब्ध आहे.

तांत्रिक अडचणींची नोंद

काही प्रकल्पांमध्ये तांत्रिक अडचणी देखील समोर आल्या आहेत.

वाघाडी आणि सायखेडा येथे पर्जन्यमापक यंत्र उपलब्ध नाही

नवरगाव प्रकल्पातील यंत्र नादुरुस्त

९ लघु प्रकल्पांची जलपातळी माहिती उपलब्ध नाही

प्रकल्पांची संख्या कमी का?

पाटबंधारे विभागातील काही लघु प्रकल्प:

३२ प्रकल्प मृद व जलसंधारण विभागाकडे हस्तांतरित

५ प्रकल्प पाटबंधारेकडे वर्ग

यामुळे विभागाकडे सध्या ३७ प्रकल्प शिल्लक असून जलाशय संख्येत घट झाली आहे.

शेतीसाठी दिलासा

मार्च महिन्यात उष्णतेचा प्रभाव वाढणार असला तरी सध्याचा जलसाठा लक्षात घेता.

सिंचनासाठी पाणी उपलब्ध राहण्याची शक्यता

उन्हाळी टंचाई टाळण्यास मदत

उन्हाळी पिकांना आधार मिळणार असल्याचे संकेत प्रशासनाकडून देण्यात आले आहेत.

उन्हाची तीव्रता वाढत असली तरी जिल्ह्यातील जलसाठा समाधानकारक असल्याने शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे. योग्य नियोजन केल्यास येणाऱ्या उन्हाळ्यात शेतीसाठी पाण्याची उपलब्धता टिकवून ठेवता येऊ शकते.

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Dam Water Storage : यंदा उन्हाळ्यात पाणीटंचाई टळणार? जाणून घ्या राज्यात किती पाणीसाठा उपलब्ध!

अधिक वाचा : Dam Water Level Decreasing : जालना जिल्ह्यात पाणीसाठ्यात मोठी घट! मे-जूनपर्यंत पुरणार का पाणी? वाचा सविस्तर

English
हिंदी सारांश
Web Title : Yavatmal Dams Offer Hope: Sufficient Water for Summer Agriculture

Web Summary : Despite rising temperatures, Yavatmal district's dams hold 63.62% water. Major projects like Pus, Arunaavati, and Bembla ensure irrigation. Smaller projects have 21% more water than last year. Though some face technical issues, overall, farmers can expect sufficient water for summer crops, averting potential scarcity.
टॅग्स :शेती क्षेत्रधरणपाणीशेतकरीशेती