Join us
Daily Top 2Weekly Top 5

Heat Wave Alert : एप्रिलपासून जूनपर्यंत देशभरात अधिक उष्णतेच्या लाटा; महाराष्ट्रात कसे असणार तापमान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2026 09:04 IST

heat wave alert आग्नेय द्वीपकल्पीय प्रदेशात, एप्रिल ते जून या कालावधीत नेहमीपेक्षा अधिक दिवस उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे.

पूर्व, मध्य आणि वायव्य भारताच्या काही भागांमध्ये, तसेच आग्नेय द्वीपकल्पीय प्रदेशात, एप्रिल ते जून या कालावधीत नेहमीपेक्षा अधिक दिवस उष्णतेच्या लाटा येण्याची शक्यता आहे.

असे भारतीय हवामान विभागाने (आयएमडी) मंगळवारी आपल्या मासिक अंदाजात नमूद केले. या तीन महिन्यांदरम्यान, देशाच्या अनेक भागांमध्ये कमाल तापमान 'सामान्य' किंवा 'सामान्यपेक्षा कमी' राहण्याची अपेक्षा आहे.

याला अपवाद म्हणजे पूर्व आणि ईशान्य भारताचा बहुतांश भाग, तसेच मध्य भारताचा पूर्व भाग आणि त्याला लागून असलेला द्वीपकल्पीय प्रदेश असतील.

या ठिकाणी कमाल तापमान 'सामान्यपेक्षा जास्त' राहण्याची शक्यता आहे. तिथे उष्णतेच्या लाटेचा सामना लोकांना करावा लागेल.

महाराष्ट्रात काय स्थिती?◼️ उष्णतेच्या कालावधीत (एप्रिल-मे-जून), देशाच्या बहुतांश भागांमध्ये किमान तापमान 'सामान्यपेक्षा जास्त' राहण्याची शक्यता आहे.◼️ याला अपवाद महाराष्ट्र आणि तेलंगणाच्या काही प्रदेशांमधील भाग असतील.

एप्रिलमध्ये पर्जन्यमान 'सामान्यपेक्षा जास्त'◼️ एप्रिल २०२६ मध्ये, संपूर्ण देशाचा सरासरी विचार करता, पर्जन्यमान 'सामान्यपेक्षा जास्त' राहण्याची शक्यता आहे.◼️ याला अपवाद ईशान्य भारताचा असेल, असे आयएमडीने म्हटले आहे.

अधिक वाचा: उन्हाळ्यात बाहेर झोपताय? सावधान! सुरु झालाय 'या' सापांचा मिलनकाळ; कशी घ्याल काळजी?

टॅग्स :तापमानहवामान अंदाजमहाराष्ट्रभारततेलंगणा