Join us

PM Kisan : पीएम किसानचे नवे अपडेट आले, बंद झालेला हफ्ता होईल चालू, फक्त 'हे' करा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2025 15:06 IST

PM Kisan : पीएम किसान लाभार्थी शेतकऱ्यांचे हफ्ते बंद झाले असल्यास, त्या शेतकऱ्यांना नवा पर्याय देण्यात आला आहे.

PM Kisan Scheme : पी एम किसान (PM Kisan Yojana) योजनेत अनेक शेतकरी सहभागी आहेत. मात्र काही शेतकऱ्यांकडून चुकीमुळे आपले खाते हे बंद झाले आहे. शेतकऱ्यांच्या एका चुकीमुळे हप्ता बंद झाला आहे. अशा शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक बातमी आहे. 

पीएम किसानच्या पोर्टलवर (PM Kisan Portal) Voluntary Surrender नावाचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. ज्यामध्ये जर शेतकऱ्याला स्वच्छेने या योजनेतून बाहेर पडायचे असेल किंवा या योजनेचा लाभ बंद करायचा असल्यास हा पर्याय देण्यात आला होता. अनेक शेतकऱ्यांना याबद्दल अचूक माहिती नसल्याने या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपोआप सदर खाते बंद झाले, परिणामी पीएम किसानचे हफ्ते मिळणे बंद झाले. 

ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून चुकीने हा पर्याय निवडला गेला असेल, त्या शेतकऱ्यांना पुन्हा एकदा हप्ते येणे चालू होण्यास मदत होणार आहे. यासाठी पी एम किसान पोर्टल वर Voluntary  Surrender Revocation हा पर्याय देण्यात आला आहे. 

पुन्हा खाते चालू कसे करायचे, जेणेकरून हफ्ते मिळतील?

  • सर्वप्रथम पी एम किसानच्या https://pmkisan.gov.in/Pmkisanbenefitsurrender_revocation.aspx अधिकृत पोर्टलवर जायचं आहे. 
  • या ठिकाणी Farmers Corner या विंडोवरील Voluntary Surrender Revocation या पर्यायावर क्लिक करायचा आहे. 
  • या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपला आधार नंबर किंवा नोंदणी क्रमांक टाकून Get OTP या पर्यायावर क्लिक करायचा आहे. 
  • ओटीपी आल्यानंतर खाली दिलेल्या बॉक्स वर प्रविष्ट करून Verify ओटीपी वर क्लिक करायचा आहे. 
  • यानंतर संबंधित शेतकऱ्याची माहिती समोरच्या विंडोवर दिसेल. 
  • त्याखाली एक स्वयंघोषणापत्र देण्यात आला आहे, त्यावर क्लिक करायचे आहे.                                                                                              त्याचबरोबर आपल्याला विचारण्यात येईल की आपल्याला आपले खाते पुन्हा सुरू करायचे आहे का? त्यावर Yes असा पर्याय निवडायचा आहे. 
  • त्यानंतर Proceed For E Kyc या पर्यायावर क्लिक करायचा आहे. 
  • पुढील विंडोवर अटी शर्थीचे एक Page दिसून येईल, यावर क्लिक करून Submit करायचे आहे. 
  • यानंतर पुन्हा आपल्या आधार संलग्न मोबाईल नंबरवर ओटीपी पाठवण्यात येईल. हा ओटीपी व्हेरिफाय केल्यानंतर आपले खाते पुन्हा एकदा चालू झाल्याचा मेसेज मोबाईलवर येईल.
  • अशा पद्धतीने ज्या शेतकऱ्यांनी आपले खाते अनावधानाने बंद केले असेल. त्यांना पुन्हा एकदा चालू करण्याची संधी पीएम किसानच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
टॅग्स :प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनाशेती क्षेत्रकृषी योजनाशेतकरी