Kharip Kanda Kadhani : खरीप कांद्याची काढणी साधारणपणे ऑक्टोबर ते डिसेंबर महिन्यात केली जाते, जी पीक लागवडीनंतर सुमारे १०० ते ११० दिवसांनी काढणीस तयार होते. काढणीच्या वेळी नेमकी काय काय काळजी घ्यावी, हे समजून घेऊयात...
खरीप कांदा काढणी
- खरिपाच्या कांदा पिकाची काढणी वेगवेगळ्या जातींनुसार पुनर्लागवडीनंतर १०० ते ११० दिवसांनी करावी.
- खरिपात कांदा तयार झाला तरी माना पडतीलच असे नाही.
- अशावेळी पीक काढणीच्या दोन किंवा तीन दिवस आधी रिकामा बॅरल फिरवून कृत्रिमरीत्या माना पाडाव्या लागतात.
- शेत कोरडे असताना पीक काढणी करावी.
- कांदा काढल्यानंतर तो शेतामध्ये पातीसह तीन ते चार दिवस सुकण्यास पडू द्यावा.
- प्रत्येक वाफ्यातील कांदा अशा रीतीने ठेवावा की, दुसरी ओळ पहिल्या ओळीचा फक्त कांदा झाकेल आणि पात उघडी राहील.
- तीन ते चार दिवसांत कांद्याची पात पूर्णपणे सुकते. कांद्याची पूर्ण सुकलेली पात २ ते २.५ सें.मी. लांब मान ठेऊन कापावी.
- नंतर जोडकांदे, डेंगळे आलेले कांदे आणि चिंगळी कांदे काढून टाकावे.
- राहिलेले चांगले कांदे गोळा करून सावलीत १० ते १२ दिवस ठेवावे.
- खरिपात काढणीच्या वेळी पावसाची शक्यता वाटत असल्यास पिकाची काढणी लवकर म्हणजे ९० ते १०० दिवसांनी सुद्धा करता येईल.
- मात्र असे कांदे ताबडतोब बाजारात विकावे.
- ग्रामीण कृषी मौसम सेवा आणि विभागीय संशोधन केंद्र, इगतपुरी