Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >बाजारहाट > Kapus Kharedi :'सीसीआय' केंद्रांचे शटडाऊन; शेतकऱ्यांची कापूसकोंडी वाढली

Kapus Kharedi :'सीसीआय' केंद्रांचे शटडाऊन; शेतकऱ्यांची कापूसकोंडी वाढली

latest news Kapus Kharedi: Shutdown of 'CCI' centers; Farmers' cotton crisis increases | Kapus Kharedi :'सीसीआय' केंद्रांचे शटडाऊन; शेतकऱ्यांची कापूसकोंडी वाढली

Kapus Kharedi :'सीसीआय' केंद्रांचे शटडाऊन; शेतकऱ्यांची कापूसकोंडी वाढली

Kapus Kharedi : कापूस खरेदी केंद्रे अचानक बंद केल्याने अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असताना सरकारी खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांची कापूसकोंडी झाली असून मोठ्या आर्थिक फटक्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Kapus Kharedi)

Kapus Kharedi : कापूस खरेदी केंद्रे अचानक बंद केल्याने अमरावती आणि यवतमाळ जिल्ह्यातील हजारो शेतकरी अडचणीत सापडले आहेत. खुल्या बाजारात हमीभावापेक्षा कमी दर मिळत असताना सरकारी खरेदी बंद झाल्याने शेतकऱ्यांची कापूसकोंडी झाली असून मोठ्या आर्थिक फटक्याची भीती व्यक्त केली जात आहे. (Kapus Kharedi)

Kapus Kharedi : अमरावती व यवतमाळ जिल्ह्यात कापूस उत्पादक शेतकरी मोठ्या अडचणीत सापडले आहेत.(Kapus Kharedi)

CCI (Cotton Corporation of India) ने २७ फेब्रुवारीपासून कापूस खरेदी केंद्रे बंद केल्याने हजारो शेतकरी प्रतीक्षेत राहिले असून खुल्या बाजारात कमी दरात कापूस विकण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे.(Kapus Kharedi)

७ ते ८ हजार शेतकरी प्रतीक्षेत

जिल्ह्यातील किमान ७ ते ८ हजार नोंदणीकृत शेतकरी कापूस विक्रीसाठी प्रतीक्षेत असताना सीसीआयची खरेदी थांबली. यामुळे शेतकऱ्यांनी केंद्र शासनाकडे खरेदीला मुदतवाढ देण्याची मागणी केली आहे.

१ जानेवारीपासून कापसावर ११% आयात शुल्क लागू झाल्यानंतर दरांनी हमीभाव ओलांडला होता.

मात्र महिनाभरात दर घसरले आणि सध्या खासगी बाजारात हमीभावापेक्षा ५०० ते ६०० रुपये कमी दर मिळत आहेत.

अशा परिस्थितीत सीसीआयची हमी दराने खरेदी हा शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा पर्याय होता. मात्र खरेदी बंद झाल्याने कापसाची कोंडी निर्माण झाली आहे.

उत्पादन घटले, अडचणी वाढल्या

* अतिवृष्टी

* बोंडअळीचा प्रादुर्भाव

* बोंडसड

यामुळे गत खरीप हंगामात कापूस उत्पादनात घट झाली होती. नोव्हेंबरमध्ये उशिरा सुरू झालेल्या सीसीआय खरेदीमुळे अनेक शेतकऱ्यांना आर्थिक अडचणीत कापूस कमी दरात विकावा लागला.

आता दरवाढीच्या प्रतीक्षेत असतानाच खरेदी बंद झाल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत.

बाजारभावावर दबाव

सीसीआयने खरेदी बंद केल्यानंतर:

* खासगी व्यापाऱ्यांचे वर्चस्व वाढण्याची शक्यता

* दर आणखी घसरण्याचा अंदाज

* किमान १०० रुपयांपर्यंत भाव कमी होण्याची शक्यता

सध्या बाजारातील दर

तारीखदर (रु./क्विंटल)
२८ जानेवारी७९०० – ८१००
०२ फेब्रुवारी७८०० – ८०००
०६ फेब्रुवारी७६०० – ७८००
१८ फेब्रुवारी७३०० – ७५५०
२५ फेब्रुवारी७४०० – ७६२५
२७ फेब्रुवारी७४०० – ७६००

यवतमाळमध्ये स्थिती अधिक गंभीर

यवतमाळ जिल्ह्यात १३ नोव्हेंबरपासून १३ केंद्रांवर कापूस खरेदी सुरू होती. ऑनलाइन नोंदणी, पीकपेरा आणि स्लॉट बुकिंगसारख्या अटी पूर्ण करून १ लाख ४८ हजार ८८६ शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती.

त्यापैकी १,१०,००० शेतकऱ्यांनी १६.९० लाख क्विंटल कापूस विकला

अजूनही मोठ्या प्रमाणात कापूस शेतकऱ्यांकडे शिल्लकमात्र खरेदी बंद झाल्याने उर्वरित शेतकऱ्यांना खुल्या बाजारावर अवलंबून राहावे लागणार आहे.

क्विंटलमागे २००० रुपयांचा फटका

सध्या व्यापारी फरदड दर्जाचा कापूस असल्याचे सांगत ६,००० ते ७,००० रुपये दर देत आहेत.

सीसीआय केंद्र बंद झाल्याने शेतकऱ्यांना क्विंटलमागे तब्बल २००० रुपयांपर्यंत तोटा सहन करावा लागू शकतो.

मुदतवाढ मिळाली, पण अपुरी?

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडे मुदतवाढीची मागणी केली होती. त्यानंतर केवळ महाराष्ट्रासाठी १५ मार्चपर्यंत खरेदीची मुदतवाढ देण्यात आली असल्याची माहिती सीसीआयचे अध्यक्ष ललित गुप्ता यांनी दिली आहे.

शेतकऱ्यांची मागणी काय?

* राज्य पणन महासंघामार्फत खरेदी सुरू ठेवता आली असती

* सीसीआयने अचानक खरेदी बंद केल्याने पर्याय उरला नाही

दरवर्षी जिल्ह्यात सुमारे ३५ लाख क्विंटल कापूस उत्पादन होते. त्यातील मोठा हिस्सा अजूनही शेतकऱ्यांकडे असताना खरेदी थांबविल्याने आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे.

कापूस विक्रीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्यासाठी केंद्राने अधिक मुदतवाढ द्यावी, अशी शेतकऱ्यांची मागणी जोर धरत आहे.

हे ही वाचा सविस्तर : Kapus Kharedi : स्लॉट संपले, केंद्र बंद; कापूस विक्री ठप्प वाचा सविस्तर

अधिक वाचा : Kapus Kharedi : पैठणमध्ये कापूस खरेदीचा विक्रम; शेतकऱ्यांचा सीसीआयकडे वाढता ओढा

Web Title : रुई खरीद रुकी: सीसीआई के बंद होने से किसान संकट में

Web Summary : अमरावती और यवतमाल जिलों में सीसीआई द्वारा कपास खरीद रोकने से हजारों किसान इंतजार कर रहे हैं, जिससे उन्हें कम कीमतों पर बेचने के लिए मजबूर होना पड़ रहा है। किसानों को ₹2000 प्रति क्विंटल का नुकसान हो रहा है। 15 मार्च तक बढ़ाई गई, लेकिन किसान और विस्तार की मांग कर रहे हैं।

Web Title : Cotton Purchase Stalled: CCI Shutdowns Leave Farmers in Dire Straits

Web Summary : CCI's cotton procurement halt in Amravati and Yavatmal districts has left thousands of farmers waiting, forcing distress sales at lower prices. Farmers face losses of ₹2000 per quintal. Though extended to March 15, farmers demand further extensions amid reduced yields and market pressures.