नवी मुंबई: महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बुधवारी बारामती येथे विमान अपघातात निधन झाल्याने संपूर्ण राज्यात शोककळा पसरली आहे.
राजकीय, सामाजिक, सहकार, व्यापारी अशा विविध क्षेत्रांतून शोक व्यक्त करण्यात येत असून, दुखवटा म्हणून मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीतील पाचही मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय एपीएमसीतील व्यापारी संघटना, आडते आणि माथाडी कामगार संघटनांनी घेतला होता.
एक दिवसाचा दुखवटा पाळून बुधवारी एपीएमसी बाजारातील मसाला व धान्य मार्केट दिवसभर बंद ठेवले होते.
भाजीपाला, फळमार्केट, कांदा बाजार आज बंद◼️ भाजीपाला, फळे आणि कांदा बटाटा मार्केट गुरुवारी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती व्यापारी संघटनांनी दिली.◼️ या निर्णयामुळे घाऊक व्यवहारांवर परिणाम होणार असून, बाजार समितीतील व्यवहार ठप्प राहणार आहेत.◼️ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनामुळे शासनाने दुखवटा जाहीर केला असून, संघटनांनी उद्या एक दिवस मार्केट बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे एपीएमसीचे सचिव शरद जरे यांनी सांगितले.
अधिक वाचा: सातबारा उताऱ्यातील फेरफारच्या नोटिसा आता घरपोच मिळणार; भूमी अभिलेख विभागाचा 'हा' नवा प्रयोग
Web Summary : Following Deputy Chief Minister Ajit Pawar's demise, Navi Mumbai's APMC market, including vegetable, fruit, and onion sections, will remain closed Thursday. Trade unions decided on the shutdown as a mark of respect. Normal operations are expected to resume soon, after the one-day mourning period.
Web Summary : उपमुख्यमंत्री अजित पवार के निधन के बाद, नवी मुंबई की एपीएमसी मंडी, जिसमें सब्ज़ी, फल और प्याज अनुभाग शामिल हैं, गुरुवार को बंद रहेगी। व्यापार संघों ने सम्मान के तौर पर बंद का फैसला किया। सामान्य कामकाज जल्द ही फिर से शुरू होने की उम्मीद है।