Lokmat Agro >शेतशिवार > आषाढी वारीमध्ये पंढरपुरातील 'हे' कुटुंब चुरमुरे विक्रीतून करते कोटींची उलाढाल; वाचा सविस्तर

आषाढी वारीमध्ये पंढरपुरातील 'हे' कुटुंब चुरमुरे विक्रीतून करते कोटींची उलाढाल; वाचा सविस्तर

'This' family from Pandharpur makes a turnover of crores by selling churmure during Ashadhi Wari; Read in detail | आषाढी वारीमध्ये पंढरपुरातील 'हे' कुटुंब चुरमुरे विक्रीतून करते कोटींची उलाढाल; वाचा सविस्तर

आषाढी वारीमध्ये पंढरपुरातील 'हे' कुटुंब चुरमुरे विक्रीतून करते कोटींची उलाढाल; वाचा सविस्तर

आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंढरपूरमधील व्यापाऱ्यांची आषाढी वारीमध्ये लागणारे प्रासादिक साहित्य बनविण्यासाठी धावाधाव सुरू आहे.

आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंढरपूरमधील व्यापाऱ्यांची आषाढी वारीमध्ये लागणारे प्रासादिक साहित्य बनविण्यासाठी धावाधाव सुरू आहे.

शेअर :

Join us
Join usNext

धनंजय वाघमोडे
पंढरपूर : आषाढी यात्रा सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पंढरपूरमधील व्यापाऱ्यांची आषाढी वारीमध्ये लागणारे प्रासादिक साहित्य बनविण्यासाठी धावाधाव सुरू आहे.

विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनानंतर लागणारा महाप्रसाद म्हणजे चुरमुरे, बत्ताशे, साखर कांडी, साखर वाटाणा, साखर फुटाणा या मालाची खरेदी-विक्री सुरू झाली आहे. चुरमुरेच्या माध्यमातून कोट्यवधींची उलाढाल होत आहे.

गुजरातमधून सहा हजार पोती चिरमुरे पंढरपुरात येताहेत. या महाप्रसादामध्ये प्रामुख्याने लागणारे भट्टीच्या माध्यमातून सात रुपये प्रमाणे मिठाचे शेंगदाणे भाजून दिले जात आहेत. दररोज ५० किलो शेंगदाणे भाजून देतात.

आषाढी वारीमध्ये गुजरात येथून साधारणतः सहा हजार पोती कच्ची साळ तेथील व्यापारी थेट आषाढी वारीमध्ये विक्रेत्यांना दिली जाते. त्या विक्रीतून साधारणतः १ कोटी ८० हजारांची आर्थिक उलाढाल होते.

पंढरपूरमधील ज्ञानेश्वर दत्तात्रय गांडुळे व भारत पांडुरंग कदम यांच्या मालकीच्या दोन चुरमुरे भट्टया आहेत. त्यांच्या माध्यमातून आषाढी यात्रा कालावधीत सुमारे १ कोटी ८० हजारांची उलाढाल होत आहे.

चुरमुरे बनवण्यासाठी एक महिन्यापूर्वी आंध्र प्रदेश व रायगड येथून २५ टन कच्ची साळ मालाची खरेदी केली. त्याच्या माध्यमातून २५०० पोती चुरमुरे तयार होतात. चुरमुरे बनवण्यासाठी किमान दहा ते वीस दिवस लागतात. यासाठी पाच ते सात कामगार काम करतात.

दररोज ५० किलो चुरमुरे तयार
◼️ भट्टीच्या माध्यमातून साळ भाजून काढली जाते. त्यानंतर ही साळ उन्हामध्ये वाळविली जाते.
◼️ कच्च्या साळीपासून तयार झालेला तांदूळ पक्क्या भट्टीमध्ये भाजून दररोज ५० किलो चुरमुरे तयार होतात.
◼️ २ किलोच्या एका पोत्याचे ५०० रुपयांप्रमाणे होलसेल दरात विक्री होत असल्याचे ज्ञानेश्वर गांडुळे यांनी सांगितले.
◼️ यंदा वारकऱ्यांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने प्रासादिक साहित्य बनविण्यात येत आहे.
◼️ प्रत्येक ठिकाणी कामगार सध्या कामात व्यस्त असल्याचे पाहायला मिळाले.

अधिक वाचा: Uajni Dam : बघता बघता उजनी धरणाने शंभरी गाठली; भीमा नदीतील विसर्ग वाढवला

Web Title: 'This' family from Pandharpur makes a turnover of crores by selling churmure during Ashadhi Wari; Read in detail

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.