Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > शेतजमिनींच्या मालकी हक्काचे स्वरूप बदलले; सव्वाकोटी नवे सातबारे तर नकाशांच्या संख्येत तीन पट वाढ

शेतजमिनींच्या मालकी हक्काचे स्वरूप बदलले; सव्वाकोटी नवे सातबारे तर नकाशांच्या संख्येत तीन पट वाढ

The ownership structure of agricultural lands has changed; 1.25 crore new land plots and the number of maps has increased threefold | शेतजमिनींच्या मालकी हक्काचे स्वरूप बदलले; सव्वाकोटी नवे सातबारे तर नकाशांच्या संख्येत तीन पट वाढ

शेतजमिनींच्या मालकी हक्काचे स्वरूप बदलले; सव्वाकोटी नवे सातबारे तर नकाशांच्या संख्येत तीन पट वाढ

satbara utara वारसा हक्काने होणारी वाटणी, जमिनींची खरेदी-विक्री आणि वाढते शहरीकरण यामुळे सातबारा उताऱ्यांवर नवीन पोटहिस्से तयार होऊन नकाशे आणि सातबारा उतारे यांचा आकडा आता १ कोटी ६२ लाखांच्या घरात पोहोचला आहे.

satbara utara वारसा हक्काने होणारी वाटणी, जमिनींची खरेदी-विक्री आणि वाढते शहरीकरण यामुळे सातबारा उताऱ्यांवर नवीन पोटहिस्से तयार होऊन नकाशे आणि सातबारा उतारे यांचा आकडा आता १ कोटी ६२ लाखांच्या घरात पोहोचला आहे.

पुणे: राज्यात गेल्या शतकभरात जमिनींच्या मालकी हक्काचे स्वरूप पूर्णपणे बदलले असून, १९३० च्या तुलनेत आज राज्यातील सातबारा उतारे आणि जमिनीच्या नकाशांची संख्या तब्बल तीन पटीने वाढली आहे.

वारसा हक्काने होणारी वाटणी, जमिनींची खरेदी-विक्री आणि वाढते शहरीकरण यामुळे सातबारा उताऱ्यांवर नवीन पोटहिस्से तयार होऊन नकाशे आणि सातबारा उतारे यांचा आकडा आता १ कोटी ६२ लाखांच्या घरात पोहोचला आहे.

राज्यात १८९० ते १९३० या काळात पहिली भूमापन प्रक्रिया झाली होती. त्यावेळी ५० लाख २१ हजार इतके जमिनीचे नकाशे आणि तेवढेच सातबारा उतारे तयार झाले होते.

त्यानंतर १९९२ पासून डिसेंबर २०२४ पर्यंत खरेदी-विक्री, वारसहक्क किंवा वाटणीमुळे तब्बल २ कोटी १२ लाख ७६ हजार ४९९ नवे पोटहिस्से तयार झाले आहेत.

सातबारा उताऱ्यांची संख्या वाढली, मात्र त्या तुलनेत जमिनींच्या नकाशांचे अद्ययावतीकरण झाले नाही. हे अद्ययावतीकरण महसूल विभागासमोर मोठे आव्हान ठरले आहे.

या नवीन पोटहिस्स्यांची मोजणीच झालेली नाही. परिणामी, कागदोपत्री सातबारा उतारा तयार असतो, पण नकाशात त्या जमिनीची नेमकी हद्द दिसत नाही.

यामुळे शेतकरी, बँका आणि पीक विमा कंपन्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अनेक ठिकाणी मूळ नकाशात बदल न झाल्यामुळे सीमांचे वाद कोर्टापर्यंत पोहोचले आहेत.

अधिक वाचा: जमीन 'एनए' करण्यासाठी आता परवानगीची गरज नाही; काय आहे नवीन निर्णय? वाचा सविस्तर

Web Title : भूमि स्वामित्व में बदलाव: महाराष्ट्र में भूमि अभिलेखों में तीन गुना वृद्धि

Web Summary : महाराष्ट्र में भूमि स्वामित्व संरचना में भारी बदलाव आया है। विरासत, बिक्री और शहरीकरण के कारण 1930 से भूमि अभिलेख तीन गुना बढ़ गए। नए उपखंडों ने लाखों भूमि हिस्से बनाए, जिससे राजस्व विभाग को भूमि मानचित्रों को अद्यतन करने में चुनौती मिली, जिससे किसानों और बैंकों के लिए विवाद हुए।

Web Title : Land Ownership Changes: Maharashtra Sees Threefold Rise in Land Records

Web Summary : Maharashtra's land ownership structure has transformed drastically. Land records increased threefold since 1930 due to inheritance, sales, and urbanization. New subdivisions created millions of land portions, challenging revenue department to update land maps, causing disputes for farmers and banks.