Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला; समितीने केलेल्या शिफारसीच्या आधारावर पुढील प्रक्रिया

Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला; समितीने केलेल्या शिफारसीच्या आधारावर पुढील प्रक्रिया

Shetkari Karjmafi : Decision on farmer loan waiver taken; Further process based on the recommendations made by the committee | Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला; समितीने केलेल्या शिफारसीच्या आधारावर पुढील प्रक्रिया

Shetkari Karjmafi : शेतकरी कर्जमाफीचा निर्णय झाला; समितीने केलेल्या शिफारसीच्या आधारावर पुढील प्रक्रिया

कर्जाची वसुली जूनपर्यंत होते, त्यामुळे जूनपर्यंत मुदत आहे. याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झाली असून या भूमिकेशी सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. अन्य विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे.

कर्जाची वसुली जूनपर्यंत होते, त्यामुळे जूनपर्यंत मुदत आहे. याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झाली असून या भूमिकेशी सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. अन्य विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे.

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफीचा निर्णय घेणार अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. कर्जमाफीच्या अनुषंगाने एक समिती आम्ही गठीत केली आहे.

एप्रिलपर्यंत या समितीने शिफारस करायची आहेत. त्या आधारावर पुढची प्रक्रिया करून तीन महिन्यात म्हणजे ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करण्यात येईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.

सह्याद्री अतिथीगृह येथे शेतकरी कर्जमाफी संदर्भात आंदोलक प्रतिनिधी शिष्टमंडळ सोबत मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली  बैठक झाली.

मुख्यमंत्री म्हणाले, नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक आहे, कारण तसे केले नाही तर रब्बीची पेरणी त्यांना करता येणार नाही. म्हणून आता ३२ हजार कोटींच्या पॅकेज वितरण याला प्राधान्य आहे.

पूर्व अतिवृष्टीमुळे अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पॅकेजच्या माध्यमातून ३२ हजार कोटी रूपये मदत दिली जात आहे. आत्तापर्यंत ८००० कोटी रुपये खात्यात दिले गेले आहेत.

या आठवड्याअखेर १८,५०० कोटी रुपये दिले जाणार असून पंधरा दिवसात ९० टक्के शेतकऱ्यांच्या थेट खात्यात रक्कम जाईल या दृष्टीने तरतूद केली असून निर्देश दिले आहेत.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, आमच्या जाहीरनाम्यात कर्जमाफीचा निर्णय होता. पण ही तात्कालिक बाब आहे. दीर्घकालीन उपाययोजना करण्यासाठी एक समिती स्थापन करण्यात आली आहे.

कर्जाची वसुली जूनपर्यंत होते, त्यामुळे जूनपर्यंत मुदत आहे. याबाबत आंदोलकांशी झालेल्या सकारात्मक चर्चा झाली असून या भूमिकेशी सर्व नेत्यांनी सहमती दर्शवली आहे. अन्य विषयांवर पुढच्या आठवड्यात बैठक घेणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की कर्जमाफी कशी करायची याबाबत एप्रिलपर्यंत समिती शिफारस करेल शिफारशीच्या आधारावर पुढच्या तीन महिन्यात म्हणजे ३० जून २०२६ पर्यंत कर्जमाफी करणार.

नैसर्गिक आपत्तीमुळे संकटात असलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात आता पैसे देणे आवश्यक असून रब्बीची पेरणी करता यावी, म्हणून आता ३२ हजार कोटींच्या पॅकेज वितरणास प्राधान्य आहे.

अधिक वाचा: पशुपालन व्यवसायास आता वीजदरात मिळणार सवलत; कुणाला मिळणार कसा लाभ? वाचा सविस्तर

Web Title : किसान ऋण माफी की घोषणा; समिति की सिफारिशों पर आधारित प्रक्रिया

Web Summary : मुख्यमंत्री ने जून 2026 से पहले किसान ऋण माफी की घोषणा की, जो अप्रैल तक आने वाली एक समिति की रिपोर्ट द्वारा निर्देशित है। प्राकृतिक आपदाओं का सामना कर रहे किसानों की सहायता के लिए ₹32,000 करोड़ का पैकेज प्राथमिकता है, जिसमें से ₹8,000 करोड़ पहले ही वितरित किए जा चुके हैं और आगे भी किए जाएंगे।

Web Title : Farmer Loan Waiver Announced; Process Based on Committee Recommendations

Web Summary : Chief Minister announced farmer loan waivers before June 2026, guided by a committee report due by April. A ₹32,000 crore package prioritizes aiding farmers facing natural disasters, with ₹8,000 crore already disbursed and more to follow.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.