सहदेव खोत
सांगली जिल्ह्याच्या शिराळा तालुक्यात यंदाच्या खरीप हंगामात कष्टाने वाढविलेल्या भात पिकाला समाधानकारक उतारा असल्याचे शेतकऱ्यांतून बोलले जात आहे. तालुक्यात शिराळी मोठे या स्थानिक वाणाबरोबरच कोमल, रत्ना १, रत्नागिरी २४, जोरदार, अजिता, इंद्रायणी, तुळशी आदी जातीच्या बियाण्यांपासून शेतकऱ्यांनी पीक घेतले आहे.
शिराळा तालुक्यात यंदा सरासरीपेक्षा जादा पाऊस पडला. तालुक्यात खरीप हंगामात भात हे प्रमुख पीक घेतले जाते. कोकण भाग सोडला तर इतर भागात धूळवाफ पेरण्या होतात. परंतु, या वर्षी पावसाने मे महिन्यातच सुरुवात केल्याने सर्वत्र भात पिकाची रोप लागण करावी लागली. त्यामुळे शेतकऱ्यांना ज्यादा कष्ट घ्यावे लागले.
या वर्षी भात पिकाची रोप लागण करावी लागल्यामुळे जादा मजुरांचा वापर करावा लागला. शिवाय मागास झालेल्या पिकाचे संगोपन करण्यासाठी जास्त खर्चही करावा लागला. अनेक शेतकऱ्यांना भात रोपे विकत आणावी लागली. त्यामुळे भाताच्या उत्पादन खर्चात वाढ झाली. तालुक्याचा पश्चिम भाग हा भाताचे आगर म्हणून ओळखला जातो. या वर्षी मागास असलेल्या भात पिकाला चांगल्या लोंब्या पडलेल्या पाहावयास मिळत आहे.
या वर्षी मी वीस गुंठे शेतात भाताची आगाप पेरणी केली. पिकाचे चांगले संगोपन केले. या शेतातून मला ३० पोती भात उत्पादन झाले आहे. - सोपान साळुंखे, प्रगतशील शेतकरी, ढोलेवाडी.
Web Summary : Shirala farmers are pleased with the satisfactory rice yield this Kharif season despite increased labor and input costs due to early rains necessitating transplanting. The western part of the taluka, known for rice cultivation, is witnessing healthy crops.
Web Summary : शिराला के किसान इस खरीफ सीजन में संतोषजनक चावल की उपज से खुश हैं, हालांकि शुरुआती बारिश के कारण रोपाई की आवश्यकता के चलते श्रम और लागत में वृद्धि हुई। तालुका का पश्चिमी भाग चावल की खेती के लिए जाना जाता है और यहां अच्छी फसल देखने को मिल रही है।