Daily Top 2Weekly Top 5
Lokmat Agro >शेतशिवार > अतिवृष्टीने उद्ध्वस्त संसार: रामकलाबाईंचा टाहो 'साहेब, आता दिवाळी कशी साजरी करू?'

अतिवृष्टीने उद्ध्वस्त संसार: रामकलाबाईंचा टाहो 'साहेब, आता दिवाळी कशी साजरी करू?'

latest news The world is devastated by heavy rains: Ramkalabai's lament; 'Saheb, how will we celebrate Diwali now?' | अतिवृष्टीने उद्ध्वस्त संसार: रामकलाबाईंचा टाहो 'साहेब, आता दिवाळी कशी साजरी करू?'

अतिवृष्टीने उद्ध्वस्त संसार: रामकलाबाईंचा टाहो 'साहेब, आता दिवाळी कशी साजरी करू?'

मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि ढगफुटीने अनेक शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त केले. सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील रामकलाबाई कोल्हे या त्यातीलच एक बळी ठरल्या आहेत. 'साहेब, सर्व होत्याचं नव्हतं झालं... आता दिवाळी कशी साजरी करू?' या शब्दात त्या आपल्या आयुष्याची हकीगत सांगतात.

मराठवाड्यातील अतिवृष्टी आणि ढगफुटीने अनेक शेतकऱ्यांचे संसार उध्वस्त केले. सिल्लोड तालुक्यातील केळगाव येथील रामकलाबाई कोल्हे या त्यातीलच एक बळी ठरल्या आहेत. 'साहेब, सर्व होत्याचं नव्हतं झालं... आता दिवाळी कशी साजरी करू?' या शब्दात त्या आपल्या आयुष्याची हकीगत सांगतात.

शेअर :

Join us
Join usNext

श्यामकुमार पुरे/ सोपान कोठाळे 

सिल्लोड तालुक्यातील केळगाव परिसरात झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेल्या महिन्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे तालुक्यात सुमारे ८० हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले, हजारो एकर जमीन खरहून गेली. या आपत्तीचा सर्वाधिक फटका बसला तो केळगावच्या शेतकरी रामकला शिवाजी कोल्हे यांना.

“साहेब, सर्व होत्याचं नव्हतं झालं. पिकं वाहून गेली, शेती खरडून गेली. डोक्यावर पाच लाखांचं कर्ज, घरात खायला अन्नही नाही. आता दिवाळी काय साजरी करू?” अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी रामकलाबाई सांगतात.

२०१६ मध्ये कर्जबाजारीपणाला कंटाळून त्यांच्या पतीने आत्महत्या केली. तेव्हापासून दोन लहान मुलांचं संगोपन आणि शिक्षणाची जबाबदारी रामकलाबाईंच्या खांद्यावर आहे. 

यंदा त्यांनी मका आणि कापूस अशी खरीप पिकं घेतली होती; मात्र अतिवृष्टीमुळे सर्व स्वप्नं वाहून गेली. सुमारे दोन एकर शेती खरडून गेल्याने लाखोंचा तोटा झाला आहे.

त्यांच्या डोक्यावर सोसायटी व ग्रामीण बँकेचे मिळून एक लाख रुपयांचे कर्ज आहे, तर विहीर खोदण्यासाठी घेतलेल्या खासगी कर्जाची रक्कम चार लाखांपर्यंत पोहोचली आहे.

“शासनाने तरी आता मदतीचा हात द्यावा. कर्जमाफी मिळावी, मुलांना दिवाळीत कपडे-गोडधोड द्यायचे स्वप्न पूर्ण करायचं आहे... अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नाही,” असे म्हणत त्या पुन्हा डोळे पुसतात.

केळगावसह संपूर्ण सिल्लोड तालुक्यातील शेतकरी या आपत्तीने हतबल झाले आहेत. रामकलाबाईंचं दु:ख हे त्या हजारो शेतकऱ्यांचं प्रतिबिंब आहे, जे आजही पावसाने उद्ध्वस्त झालेल्या शेतीकडे असहायपणे पाहत आहेत.

हे ही वाचा सविस्तर : Crop Insurance Scam : शेतकऱ्यांची फसवणूक रोखली ग्रामस्थांच्या सतर्कतेने 'मापात पाप' प्रकरण उघड

Web Title : अतिवृष्टि से तबाह परिवार: रामकलाबाई का सवाल, 'दिवाली कैसे मनाएं?'

Web Summary : अतिवृष्टि ने रामकलाबाई कोल्हे के खेत को तबाह कर दिया, जिससे वह कर्ज और निराशा में डूब गईं। पति की आत्महत्या के बाद गरीबी और कर्ज से जूझ रही, वह अपने बच्चों का भरण-पोषण करने के लिए संघर्ष कर रही हैं और उन्हें निराशाजनक दिवाली का डर है। वह सरकार से सहायता की गुहार लगाती है।

Web Title : Heavy Rains Destroy Family: Ramkalabai Asks, 'How to Celebrate Diwali?'

Web Summary : Excessive rain devastated Ramkalabai Kolhe's farm, leaving her with debt and despair. Facing poverty and burdened with loans after her husband's suicide, she struggles to provide for her children and fears a bleak Diwali. She pleads for government assistance.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.