Lokmat Agro >शेतशिवार > Soybean Seeds : उगवणारं बियाणं उगवलंच नाही; कंपन्यांचे हात वर, शेतकऱ्यांची फसवणूक वाचा सविस्तर

Soybean Seeds : उगवणारं बियाणं उगवलंच नाही; कंपन्यांचे हात वर, शेतकऱ्यांची फसवणूक वाचा सविस्तर

latest news Soybean Seeds : The Soybean seeds that were supposed to sprout didn't sprout at all! Read in detail about the companies' deception of farmers | Soybean Seeds : उगवणारं बियाणं उगवलंच नाही; कंपन्यांचे हात वर, शेतकऱ्यांची फसवणूक वाचा सविस्तर

Soybean Seeds : उगवणारं बियाणं उगवलंच नाही; कंपन्यांचे हात वर, शेतकऱ्यांची फसवणूक वाचा सविस्तर

Soybean Seeds : लातूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्यांनी (Soybean Seeds) उगम न घेतल्याने शेतीची स्वप्नं चिखलात गेली आहेत. नामांकित कंपन्यांची बियाणं वापरूनही उत्पादन तर दूरच, दुबार पेरणीची वेळ आली आहे. कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारींनी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच गंभीर चिंता निर्माण केली आहे.(Soybean Seeds)

Soybean Seeds : लातूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्यांनी (Soybean Seeds) उगम न घेतल्याने शेतीची स्वप्नं चिखलात गेली आहेत. नामांकित कंपन्यांची बियाणं वापरूनही उत्पादन तर दूरच, दुबार पेरणीची वेळ आली आहे. कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारींनी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच गंभीर चिंता निर्माण केली आहे.(Soybean Seeds)

शेअर :

Join us
Join usNext

Soybean Seeds : लातूर जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांच्या सोयाबीन बियाण्यांनी (Soybean Seeds) उगम न घेतल्याने शेतीची स्वप्नं चिखलात गेली आहेत. नामांकित कंपन्यांची बियाणं वापरूनही उत्पादन तर दूरच, दुबार पेरणीची वेळ आली आहे. (Soybean Seeds)

कृषी विभागाकडे आलेल्या तक्रारींनी खरीप हंगामाच्या सुरुवातीलाच गंभीर चिंता निर्माण केली आहे. खरिपाच्या हंगामात शेतकऱ्यांनी आशेने सोयाबीनची पेरणी केली खरी, पण त्यांना आलेला अनुभव मात्र दुःखद आणि फसवणुकीचा ठरला. (Soybean Seeds)

लातूर जिल्ह्यात नामांकित कंपन्यांच्या महागड्या सोयाबीन बियाण्यांनी उगम न घेतल्यामुळे शेकडो शेतकरी आर्थिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जात आहेत. सध्या कृषी विभागाकडे फक्त १३ अधिकृत तक्रारी प्राप्त झाल्या असल्या, तरी प्रत्यक्षात ही संख्या शेकड्यांवर पोहोचली असल्याचा अंदाज आहे.(Soybean Seeds)

बियाणे उगवलेच नाहीत, शेतकरी अडचणीत

शेतकऱ्यांनी उगवणक्षमतेवर विश्वास ठेवून बियाण्यांची खरेदी केली, मात्र पेरणीनंतर १० दिवस उलटूनही अनेक ठिकाणी उगम न झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. यामुळे दुबार पेरणीची वेळ ओढवली असून, आधीच महागाई आणि खर्चाने त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांचे नुकसान अधिकच वाढले आहे.

लातूर जिल्ह्यातील खरीप पेरणीचा आढावा

सर्वसाधारण क्षेत्र (खरीप) – ६.४८ लाख हेक्टर

आतापर्यंत पेरलेले क्षेत्र – ४.४८ लाख हेक्टर

सोयाबीनचे क्षेत्र – ३.९० लाख हेक्टर (प्रमुख पीक)

तूर दुसऱ्या क्रमांकावर

कृषी विभागाची पंचनामे व अहवाल

कृषी विभागाने संबंधित शेतकऱ्यांच्या शेतांवर जाऊन पंचनामे करून कंपन्यांकडे नुकसानभरपाईचा अहवाल पाठवला आहे. मात्र कंपन्यांनी जबाबदारी झटकत हात वर केले, ज्यामुळे शेतकरी आणखी हतबल झाले आहेत. 

केवळ काही खासगी कंपन्यांनी बियाण्यांची पुनर्बदली केली असली, तरी नुकसानभरपाई देण्यास कोणीही तयार नाही.

बोगस खत व बियाण्यांवर कारवाई

या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने जिल्ह्यात दोन ठिकाणी कारवाई केली आहे:

पाथरी, परभणी

पोहेटाकळी येथे बोगस खत विक्रीवर तक्रारीनंतर नमुने तपासले गेले.

गोदाम सील करण्यात आले व एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चारठाणा, जिंतूर तालुका

बोगस बीटी कापसाच्या बियाण्याची चौकशी; चार पाकिटे जप्त करण्यात आली आहे. यामुळे दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जबाबदार कोण?

बियाणे कंपन्या जबाबदारी नाकारत असताना शेतकऱ्यांच्या हाती काय उरलं? पेरणीसाठी घेतलेले कर्ज, मजुरीचा खर्च, पुन्हा बियाणं आणणं यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.

सरकार आणि प्रशासनाला मागणी

बोगस व निकृष्ट बियाण्यांवर तात्काळ कारवाई

नुकसानभरपाईसाठी ठोस निर्णय

कंपन्यांना उत्तरदायी धरणे

दुबार पेरणीसाठी विशेष मदत पॅकेज

अन् सोयाबीन झाली माती 

ही शेतकऱ्यांची केवळ शारीरिक नाही तर मानसिक झळ आहे. कृषी क्षेत्रात प्रामाणिकता राखली नाही, तर बियाण्यांसारख्या प्राथमिक टप्प्यावरच शेतकऱ्यांचे स्वप्न उध्वस्त होते. सरकारने तत्काळ लक्ष घालून दोषींवर कडक कारवाई करावी, हीच शेतकऱ्यांची मागणी आहे.

हे ही वाचा सविस्तर : Bogus Fertilizer : शेतकऱ्यांची फसवणूक टळली! 'या' जिल्ह्यातील बोगस खत साठेबाजीवर कृषी विभागाची कारवाई

Web Title: latest news Soybean Seeds : The Soybean seeds that were supposed to sprout didn't sprout at all! Read in detail about the companies' deception of farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Agriculture and hyperlocal news from all cities of Maharashtra.