Join us

संत्रा, माेसंबी उत्पादकांची दरवर्षी 225 काेटी रुपयांनी लूट, 'या' बाजार समितीतील प्रकार

By सुनील चरपे | Updated: July 28, 2025 20:16 IST

- सुनील चरपेनागपूर : कळमना ( नागपूर ) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये (Kalmana Market yard) संत्रा ...

- सुनील चरपेनागपूर : कळमना (नागपूर) कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मार्केट यार्डमध्ये (Kalmana Market yard) संत्रा व माेसंबीच्या खरेदीवर व्यापारी शेतकऱ्यांकडून प्रति टन एक क्विंटल म्हणजेच १० टक्के काट आणि सात टक्के कमिशन घेतात. हा प्रकार मागील २५ वर्षांपासून सुरू आहे. 

या बाजार समितीत व्यापारी दरवर्षी सरासरी ३ लाख ५० हजार टन संत्रा व २ लाख ७५ हजार टन माेसंबी शेतकऱ्यांकडून खरेदी करतात. १० टक्के काट विचारात घेता शेतकऱ्यांची १५० काेटी रुपये व सात टक्के कमिशनपाेटी १०५ काेटी रुपयांची लूट सुरू आहे.

कळमना मार्केटमधील व्यापारी शेतकऱ्यांकडून ११ क्विंटल संत्रा व माेसंबी खरेदी करतात आणि १० क्विंटल (एक टन)चे पैसे देतात. साेबतच एकूण रकमेवर सात ते आठ टक्के कमिशन घेतात. हा प्रकार मागील २५ वर्षांपासून सुरू आहे. पूर्वी पाच टक्के म्हणजे १० क्विंटलवर ५० किलाे काट घेतला जायचा. 

साेबतच कमिशनदेखील कमी हाेते. सन २०१५ पासून एक क्विंटल काट व सात ते आठ टक्के कमिशन घेणे सुरू झाले. जेव्हापासून वजनाने संत्रा, माेसंबी खरेदी करणे सुरू झाले, तेव्हापासून हा प्रकार सुरू झाला, अशी माहिती व्यापाऱ्यांनी दिली. या संपूर्ण व्यवहाराची एसआयटीमार्फत स्वतंत्र चाैकशी हाेणे गरजेचे आहे....संत्र्याची खरेदीसन २०२३-२४ - ३,४५,२६० टनसन २०२४-२५ - ३,६७,२५२ टन...माेसंबीची खरेदीसन २०२३-२४ - ३,०१,२९४ टनसन २०२४-२५ - १,९६,६९४ टन

पणन संचालकांकडे तक्रारकाट व कमिशनबाबत डिसेंबर २०२४ मध्ये कळमना बाजार समितीच्या सभागृहात पणन संचालक रसाळ यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. यात संत्रा व माेसंबी उत्पादकांच्या १०० प्रतिनिधींनी आ. डाॅ. आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत रसाळ यांच्याकडे तक्रार करत हा प्रकार बंद करून कारवाईची मागणी केली. मात्र, काहीच कारवाई करण्यात आली नाही.

लुटीचा हिशेबसंत्रा व माेसंबीचे सरासरी दर २५ हजार रुपये प्रति टन आणि १० टक्के काट म्हणजेच प्रत्येकी ३० हजार टन संत्रा व माेसंबी विचारात घेतल्यास ही रक्कम प्रत्येकी ७५ काेटी रुपयांप्रमाणे १५० काेटी रुपये हाेतात. संत्रा व माेसंबीच्या एकूण रकमेवरील सात ते आठ टक्के कमिशन विचारात घेतले तर ही रक्कम १०५ काेटी रुपयांवर जाते. दाेन्ही मिळून ही लूट २२५ काेटी रुपयांवर पाेहाेचते. ही रक्कम शेतकऱ्यांना मिळत नाही.

शेतकऱ्यांनी ही काळजी घ्यावीशेतकरी एकमुस्त संत्रा, माेसंबी विकायला आणतात. त्यात लहान, मध्यम व माेठ्या आकाराची फळे असतात. व्यापारी लहान व मध्यम आकाराच्या फळांवर लक्ष केंद्रित करून दर ठरवतात व नुकसान टाळण्यासाठी काट घेतात. शेतकऱ्यांनी स्वत:च बागेची विरळणी करून माेठ्या आकाराची फळे बाजारात विकावी. झाडांवरील छाेटी व मध्यम फळे माेठी झाल्यानंतर ती बाजारात आणावी.

टॅग्स :शेती क्षेत्रमार्केट यार्डआॅरेंज फेस्टिव्हलनागपूरधोकेबाजीशेतकरी