Join us

Nuksan Bharpayee : ३ अध्यादेशांतून मराठवाड्याला २८३६ कोटींचा दिलासा; संभाजीनगरची मदत प्रलंबित

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 11:01 IST

Nuksan Bharpayee : मराठवाड्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे. शासनाने नुकतेच १३५३ कोटींच्या मदतीचा तिसरा अध्यादेश प्रसिद्ध केला असून, या निर्णयामुळे बीड, लातूर, धाराशिव, परभणी, नांदेड आणि जालना जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळणार असून, संभाजीनगर जिल्ह्याच्या मदतीचा आदेश मात्र अजून प्रतीक्षेत आहे.

Nuksan Bharpayee : सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागलं होतं. अखेर शासनाने या नुकसानीची दखल घेत १३५३ कोटी रुपयांच्या मदतीचा तिसरा अध्यादेश जारी केला आहे.

हा आदेश १६ ऑक्टोबरच्या रात्री प्रसिद्ध झाला असून, तो पुणे आणि मराठवाडा विभागासाठी लागू आहे.

तीन अध्यादेशांद्वारे मिळालेली एकूण मदत

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना नुकत्याच झालेल्या पिकांच्या नुकसानाची भरपाई म्हणून राज्य सरकारने आतापर्यंत ३ अध्यादेश काढले आहेत.

पहिला अध्यादेश : जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यातील नुकसानीसाठी १४१८ कोटींची मदत

दुसरा अध्यादेश : ६५ कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी

तिसरा अध्यादेश : सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीसाठी १३५३ कोटींची मदत

अशा प्रकारे एकूण २८३६ कोटी रुपयांचा दिलासा शासनाने मराठवाडा विभागाला दिला आहे.

संभाजीनगर जिल्ह्याची मदत अजून प्रलंबित

विभागाची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगरसाठी ५६१ कोटी रुपयांचा प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मात्र, या प्रस्तावाचा अद्याप अध्यादेश जारी झालेला नाही. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये अनिश्चिततेचं वातावरण आहे.

नुकसान झालेलं क्षेत्र व मदतीचा तपशील

सप्टेंबर महिन्यात १२ ते ३० सप्टेंबरदरम्यान झालेल्या अतिवृष्टीत मराठवाड्यातील ७८५ महसूल मंडळांतील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीच्या भरपाईसाठी शासनाने सविस्तर आढावा घेतला आणि खालीलप्रमाणे मदतीचा आराखडा ठरवला. 

जिल्हामदत (कोटी रुपये)
बीड५७७
धाराशिव (उस्मानाबाद)२९२
परभणी२४५
लातूर२०८
नांदेड२२
जालना

(एकूण मदत – १३५३ कोटी रुपये)

जिल्हानिहाय लाभार्थ्यांचा तपशील

जालना जिल्हा : ११ हजार २४८ हेक्टरवरील पिकांचे नुकसान; १६ हजार १६८ शेतकऱ्यांना ९ कोटींची मदत

उर्वरित पाच जिल्हे (बीड, धाराशिव, परभणी, लातूर, नांदेड): २१ लाख १४ हजार २२५ शेतकरी आणि २.१५ लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान; १३५३ कोटींची मदत वितरित होणार आहे.

राज्य शासनाने ज्या गतीने मदतीचे अध्यादेश जाहीर केले आहेत, त्याच वेगाने प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात निधी जमा व्हावा, अशी मागणी शेतकरी संघटनांकडून केली जात आहे.

दरम्यान, संभाजीनगर जिल्ह्याच्या ५६१ कोटींच्या मदतीचा आदेश लवकरच जारी होईल, अशी माहिती विभागीय प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

सप्टेंबर अतिवृष्टीसाठी मदत : १३५३ कोटी

एकूण तीन अध्यादेशांतून मदत : २८३६ कोटी

संभाजीनगर जिल्ह्याची मदत (५६१ कोटी) प्रलंबित

२१ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना थेट लाभ अपेक्षित

हे ही वाचा सविस्तर : Maharashtra Weather Update : काळ्या ढगांचा खेळ सुरू; सायंकाळी पुन्हा बरसणार का?

English
हिंदी सारांश
Web Title : September Damage: ₹1353 Crore Aid Announced for Marathwada Farmers

Web Summary : Maharashtra government released ₹1353 crore aid for Marathwada and Pune regions due to September's excessive rainfall, benefiting over two lakh farmers across multiple districts. Additional aid is awaited for some regions.
टॅग्स :शेती क्षेत्रपाऊसशेतकरीशेतीमराठवाडा